तिरुअनंतपुरम :'शबरीमलाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. केरळच्या शेजारील तमिळनाडू आणि कर्नाटकमधील प्रचार सभांमध्ये बोलताना ते शबरीमलाचा उल्लेख करीत आहेत. पण, केरळमधील कोझीकोड येथे झालेल्या प्रचारसभांत त्यांनी उल्लेख केला नाही. केरळमध्ये येऊन शबरीमलाविषयी काही बोललो तर मला अटक होईल, असे ते सांगत आहेत. हा त्यांचा खोटा प्रचार आहे.' असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. 'शबरीमलाप्रकरणी आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे. मोदींनीही देशाचे पंतप्रधान म्हणून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे. संघ परिवाराने काही हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना शहरात पाठविले आहे. त्यांचा अशांतता पसरविण्यात हात असला पाहिजे. शबरीमलाची संस्कृती आणि परंपरांना विरोध असणाऱ्यांचा पराभव केला पाहिजे,' असेही विजयन म्हणाले. ...
'शबरीमलाबाबत मोदी खोटे बोलत आहेत'
'शबरीमलाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत...
MT 15 Apr 2019, 4:00 am