श्रीनगर:
जम्मू-काश्मीरला विशेष सवलत देणारं कलम ३७० हटवण्यात आल्याच्या आधीपासून खबरदारीचा उपाय म्हणून तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. १४ दिवसांनंतर आज या शाळा प्रथमच उघडण्यात येणार आहेत. १९० हून अधिक प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. माध्यमिक शाळा आणखी काही काळानंतर उघडण्यात येणार आहेत. परिस्थिती सामान्य होताच अन्य जिल्ह्यांतल्या शाळादेखील उघडण्यात येतील. दुसरीकडे सुरक्षाव्यवस्था मात्र कडेकोट ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले,'तूर्त केवळ प्राथमिक शाळाच उघडण्यात येत आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यावर हळूहळू संपूर्ण खोऱ्यातील शाळा सुरू होतील. काश्मीर खोऱ्यात लावण्यात आलेली बंधनेही शिथिल केली जात आहेत. स्थानिक अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. लवकरच आणखी काही निर्बंध शिथील केले जातील.'
कंसल म्हणाले की 'श्रीनगरचे उपायुक्त शाहीद इकबाल चौधरी यांनी शनिवारी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे.'
यापूर्वी रविवारी खोऱ्यात १० आणखी टेलिफोन एक्स्चेंजनी काम करणं सुरू केलं आहे. एकूण १७ एक्स्चेंजची सेवा यापूर्वी थांबवली होती. खोऱ्यातील ५० हजार टेलिफोन फिक्स्ड लाइनपैकी २८,००० सुरू झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष सवलत देणारं कलम ३७० हटवण्यात आल्याच्या आधीपासून खबरदारीचा उपाय म्हणून तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. १४ दिवसांनंतर आज या शाळा प्रथमच उघडण्यात येणार आहेत. १९० हून अधिक प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. माध्यमिक शाळा आणखी काही काळानंतर उघडण्यात येणार आहेत.
कंसल म्हणाले की 'श्रीनगरचे उपायुक्त शाहीद इकबाल चौधरी यांनी शनिवारी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे.'
यापूर्वी रविवारी खोऱ्यात १० आणखी टेलिफोन एक्स्चेंजनी काम करणं सुरू केलं आहे. एकूण १७ एक्स्चेंजची सेवा यापूर्वी थांबवली होती. खोऱ्यातील ५० हजार टेलिफोन फिक्स्ड लाइनपैकी २८,००० सुरू झाल्या आहेत.