अ‍ॅपशहर

जगातील ३० प्रदूषित शहरात २१ फक्त भारतातच

२०१९ या वर्षात जगातील सर्वात प्रदूषित शहरात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. आयक्यू एअर विज्युअलद्वारे तयार करण्यात आलेल्या या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारतातच २१ शहरं आहेत. जागतिक वायू गुणवत्तेसाठी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. जगात गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. यानंतर होतन (चीन), गुजरावाला (पाकिस्तान), फैसलाबाद (पाकिस्तान) आणि यानंतर दिल्लीचा क्रमांक आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 5:30 pm
मुंबई : २०१९ या वर्षात जगातील सर्वात प्रदूषित शहरात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. आयक्यू एअर विज्युअलद्वारे तयार करण्यात आलेल्या या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारतातच २१ शहरं आहेत. जागतिक वायू गुणवत्तेसाठी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. जगात गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. यानंतर होतन (चीन), गुजरावाला (पाकिस्तान), फैसलाबाद (पाकिस्तान) आणि यानंतर दिल्लीचा क्रमांक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम most polluted cities in india remains for this year too in world quality index
जगातील ३० प्रदूषित शहरात २१ फक्त भारतातच


सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश पुन्हा एकदा अत्यंत खराब हवा असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर पाकिस्तान, मंगोलिया आणि अफगाणिस्तान यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, भारतीय शहरांमधील हवा गेल्या काही वर्षात सुधारली असल्याचंही निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

सर्वाधिक प्रदूषित शहरं

गाझियाबाद

गुजरानवाला (पाकिस्तान)

फैसलाबाद (पाकिस्तान)

दिल्ली

नोएडा

गुरुग्राम

रैवंडी (पाकिस्तान)

ग्रेटर नोएडा

बंधवारी

लखनौ

लाहोर (पाकिस्तान)

बुलंदशहर

मुजफ्फरनगर

बागपत

जिंद

आयक्यूएअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रँक्स हेम्स म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या करोना व्हायरस चर्चेत आहे. पण वायू प्रदूषण वर्षाला ७० लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेत आहे. जगातील एका मोठ्या भागात हवा गुणवत्तेतील अंतरात मोठं अंतर आहे आणि ते मोजलं जाऊ शकत नाही, जी एक गंभीर समस्या आहे.’ ज्या भागातल्या वायू प्रदूषणाची माहिती नाही, तिथे सर्वाधिक भीषण वायू प्रदूषण असण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या लोकसंख्येसाठी धोका निर्माण होऊ शकतो. वायू प्रदूषणाचे आकडे मिळाल्यामुळे नागरिक जागरुक होतील आणि सरकारलाही धोरण आखण्यासाठी मदत होईल, असंही ते म्हणाले.

प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते सध्या होताना दिसत नाहीत. घरगुती आणि कृषी वापरासाठी जैविक इंधनाचा जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे, पण त्याजागी जीवाश्म इंधन जास्त वापरलं जात आहे हे गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या अहवालातून स्पष्ट होतं, अशी प्रतिक्रिया ग्रीनपिसचे अविनाश चंचल यांनी या अहवालावर दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज