टाइम्स न्यूज नेटवर्क । भोपाळ
मध्य प्रदेशमधील खरगौन जिल्ह्यातील बडी गाव येथे मागील ३ महिन्यात ८० जणांनी आत्महत्या केली आहे. मागील २० वर्षांपासून गावात आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. फक्त ३२० कुटुंबांचे, २५०० लोकसंख्या असलेले बडी गाव. मात्र तिथल्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.
आत्मा, भूत-प्रेत अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्या बडी गावातील लोकांना आत्महत्यांमागचे मुख्य कारण वाईट शक्तीचा प्रभाव असे वाटते. मात्र मानसिक आजारातून गावातील नागरिक आत्महत्या करत आहेत, असा तर्क इंदूरचे मानसोपचारतज्ज्ञ मांडत आहेत. स्थानिक प्रशासनाने गावातील समस्यांमध्ये लक्ष घातले तिथे उत्तम आरोग्य सुविधा दिली तर हा प्रश्न सोडवणे शक्य होईल; असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत रेड्डी यांनी व्यक्त केला.
गावातील पाण्याची तसेच तिथल्या शेतात उगवणाऱ्या धान्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची गरज आहे. जमिनीमार्गे पिक-पाण्यात मिसळणाऱ्या काही घटकांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असावा. या परिणामामुळे गावातील अनेक नागरिक मानसिकदृष्ट्या आजारी पडत आहेत. आपल्याला नेमके काय होत आहे तेच समजत नसल्याने निराश होऊन नागरिक आत्महत्या करत असावेत. आत्महत्येआधीच्या ग्रामस्थांच्या वर्तनावरुन ते दुहेरी व्यक्तीमत्वाच्या समस्येचा सामना करत असल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.
जीवन सिसोदिया आधी बडी गावाचे सरपंच होते. मात्र २ महिन्यांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली आणि गावाने त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र सिसोदिया यांना सरपंच केले. सरपंच बदलला तरी गावाची आत्महत्येची समस्या काही सुटलेली नाही. या समस्येवर नेमका कशा पद्धतीने उपाय करावा?, हेच समजत नसल्यामुळे राजेंद्र सिसोदिया चिंतेत आहेत.
मध्य प्रदेशमधील खरगौन जिल्ह्यातील बडी गाव येथे मागील ३ महिन्यात ८० जणांनी आत्महत्या केली आहे. मागील २० वर्षांपासून गावात आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. फक्त ३२० कुटुंबांचे, २५०० लोकसंख्या असलेले बडी गाव. मात्र तिथल्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.
आत्मा, भूत-प्रेत अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्या बडी गावातील लोकांना आत्महत्यांमागचे मुख्य कारण वाईट शक्तीचा प्रभाव असे वाटते. मात्र मानसिक आजारातून गावातील नागरिक आत्महत्या करत आहेत, असा तर्क इंदूरचे मानसोपचारतज्ज्ञ मांडत आहेत. स्थानिक प्रशासनाने गावातील समस्यांमध्ये लक्ष घातले तिथे उत्तम आरोग्य सुविधा दिली तर हा प्रश्न सोडवणे शक्य होईल; असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत रेड्डी यांनी व्यक्त केला.
गावातील पाण्याची तसेच तिथल्या शेतात उगवणाऱ्या धान्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची गरज आहे. जमिनीमार्गे पिक-पाण्यात मिसळणाऱ्या काही घटकांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असावा. या परिणामामुळे गावातील अनेक नागरिक मानसिकदृष्ट्या आजारी पडत आहेत. आपल्याला नेमके काय होत आहे तेच समजत नसल्याने निराश होऊन नागरिक आत्महत्या करत असावेत. आत्महत्येआधीच्या ग्रामस्थांच्या वर्तनावरुन ते दुहेरी व्यक्तीमत्वाच्या समस्येचा सामना करत असल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.
जीवन सिसोदिया आधी बडी गावाचे सरपंच होते. मात्र २ महिन्यांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली आणि गावाने त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र सिसोदिया यांना सरपंच केले. सरपंच बदलला तरी गावाची आत्महत्येची समस्या काही सुटलेली नाही. या समस्येवर नेमका कशा पद्धतीने उपाय करावा?, हेच समजत नसल्यामुळे राजेंद्र सिसोदिया चिंतेत आहेत.