अ‍ॅपशहर

'शेतकरी आत्महत्या करतात, मल्ल्या फरार होतो'

कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात आणि विजय मल्ल्या काही हजार कोटी बुडवून देशातून पळ काढतो. तरीही सरकार मल्ल्याच काहीच वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घरचा आहेर दिला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात सरकारने असंवेदनशीलता दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच वरुण यांनी केलेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे.

Maharashtra Times 22 Feb 2017, 12:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इंदूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mp varun gandhi bjp criticized rohit vemula suicide vijay mallya farmer suicide
'शेतकरी आत्महत्या करतात, मल्ल्या फरार होतो'


कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात आणि विजय मल्ल्या काही हजार कोटी बुडवून देशातून पळ काढतो. तरीही सरकार मल्ल्याच काहीच वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घरचा आहेर दिला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात सरकारने असंवेदनशीलता दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच वरुण यांनी केलेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे.

काँग्रेसचे नेते सत्यनारायण पटेल यांच्या विद्यासागर हायस्कूलमधील एका कार्यक्रमात वरूण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत योग्य स्थान न देण्यात आले नाही. शिवायस्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेशही करण्यात आला नव्हता. त्यामुळे वरूण गांधी नाराज होते. त्यामुळेच त्यांनी मोदी सरकारला धोरणात्मक बाबींवर धारेवर धरल्याचे सांगण्यात येते.

विजय मल्ल्या हे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशातून फरार असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर देशात अनेक खटले सुरू आहेत. याप्रकरणी मल्ल्यांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. मल्ल्यांचे राज्यसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पण आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते सातत्याने आपण पळून गेले नसल्याचा दावा करतात आणि सरकार मात्र काहीच करत नाही असा हल्ला वरूण यांनी चढवला. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला संशोधन करत होता. त्याच्यावर विद्यापीठ प्रशासनाने अनेक निर्बंध लावले होते. त्यामुळे कंटाळून त्यांने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच्या आत्महत्येनंतर मोठा वाद झाला होता. यात केंद्र सरकारच्या भूमिकेवरही सवाल निर्माण करण्यात आला होता असं सांगतानाच वेमुलाची सुसाइड नोट वाचल्यानंतर मला रडू आले होते, असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरले होते. आता वरूण गांधी यांच्या या पावित्र्यावर पक्षातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

वरूण यांचे सवाल...

> देशातील आर्थिक असमानता कधी संपुष्टात येणार?

> बँकांचे कर्ज चुकविता येत नसल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे विजय मल्ल्यासारखे लोक कर्ज बुडवून देश सोडून पळून जात आहेत. सरकार त्यांचं काहीच वाकडं करू शकलेली नाही.

> रोहित वेमूला यांच्या सुसाईड नोटचा काही भागही त्यांनी वाचून दाखवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज