अ‍ॅपशहर

चार मुलांना घेऊन विहिरीत उडी घेतली, नंतर भीती वाटली, एका मुलीसोबत बाहेर पडली, पण घडलं अघटित

Women Jumps Into Well With Children: चार मुलांना घेऊन घराबाहेर पडली, विहिरीजवळ येऊन उडी घेतली. नाका-तोंडात पाणी शिरताच भीती वाटली. नंतर घडलं भयंकर

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2023, 9:23 am
मध्य प्रदेशः नवऱ्यासोबत भांडण झाले, बायको चार मुलांना घेऊन घराबाहेर पडली. विहिरीत आत्महत्याकरण्यासाठी उडी घेतली. मात्र, नेमका विचार बदलला आणि महिला जगण्यासाठी धडपड करु लागली. ही भयानक घटना मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women jumps into well  with children


घरगुती कलहानंतर ३० वर्षांची महिला तिच्या चार मुलांसह घराबाहेर पडली. त्यानंतर तिने चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले व स्वतःही उडी घेतली. मात्र, त्यानंतर तिला भीती वाटली व ती विहिरीत बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. त्याचवेळी तिने तिच्या मोठ्या मुलीचा हात पकडून विहिरीला लटकणाऱ्या रश्शीला पकडून विहिरीबाहेर आली. मात्र, या सगळ्यात तिच्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात १८ महिन्यांचा मुलगा, ३ वर्षांची आणि ५ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरयेथील बालदी गावात झाली आहे. महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. प्रमिलाचं पती रमेशसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर तिने हे भयंकर पाऊल उचललं होतं. दरम्यान प्रमिला आणि तिची सात वर्षांची मुलगी यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रेल्वेचा ‘तो’ कर्मचारी २२ वर्षांनंतर सेवेत पुन्हा रुजू होणार, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन केले होते बडतर्फ
पोलिसांनी विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महिलेच्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात येत आहे. मात्र, प्रमिला आणि तिच्या पतीमध्ये कोणत्या गोष्टीवरुन वाद सुरु होते. हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. या प्रकरणीही पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार 'वंदे भारत'; अशी आहेत चिनाब पुलाची वैशिष्ट्ये
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील नेपानगर येथील एकाच परिवारातील पाच लोकांनी आत्महत्या केली होती. घरामध्येच पती-पत्नीसह ३ अल्पवयीन मुलींचा मृतदेह सापडला होता. पतीने पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख