अ‍ॅपशहर

'...तरी भाजपनं मुस्लिमांचा सन्मानच केला!'

भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला मुस्लिमविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फटकारलं आहे. मुस्लिम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं त्यांनी निक्षून सांगितलं.

Maharashtra Times 22 Apr 2017, 9:44 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslims dont vote for us but we respect them says ravi shankar prasad
'...तरी भाजपनं मुस्लिमांचा सन्मानच केला!'


भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला मुस्लिमविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फटकारलं आहे. मुस्लिम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं त्यांनी निक्षून सांगितलं.

देशातील १३ राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतोय. अशावेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लिम लोक मतं देत नाहीत, हे मला मान्य आहे. पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही?, असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला.

देशाची संस्कृती आणि विविधता यावर विकासाचा होणारा परिणाम, या विषयासंदर्भात 'माइंड माइन' संमेलनात रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट मतं माडली. त्यावेळी भाजपची मुस्लिमविरोधी प्रतिमा पुसण्यावर त्यांचा भर होता. भाजपच्या विरोधात बऱ्याच काळापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे. पण देशातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकारमध्ये आहोत आणि इथल्या संस्कृती, विविधेतेला आम्ही वंदन करतो, असं त्यांनी नमूद केलं. जलपैगुडी इथल्या चहाच्या मळ्यात काम करणारा मुस्लिम कर्मचारी करीमुल हक यानं केलेल्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गौरव केल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं. करीमुल हक याने आपल्या मोटरसायकलचं रूपांतर अॅम्ब्युलन्समध्ये करून दोन हजारहून अधिक लोकांचे प्राण वाचवले. त्याच्या या उल्लेखनीय कार्याची दखल पंतप्रधानांनी घेतली. आम्ही त्याचा धर्म पाहिला नाही किंवा त्याने आम्हाला मत दिलंय का, याचाही विचार केला नाही, असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं. कधी काही गैरप्रकार होत असतील, तर पंतप्रधान त्यात लक्ष घालतात, मुख्यमंत्री ते प्रश्न सोडवतात, असा निर्वाळा त्यांनी दिला.

मोदींबद्दल जनतेच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डाव्या मित्रांना आणि पत्रकारांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज