मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
'सार्क' देशांच्या परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले गृहमंत्री राजनाथ सिंह व भारतीय मीडियाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पाकिस्तान सरकारचा आज संसदेत सर्व पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी पाकिस्तानात नेमके काय घडले, अशी विचारणा केली असता राजनाथ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून देशाच्या आत्मसन्मानाला कोणताही धक्का लागू नये म्हणूनच आपण पाकिस्तानचं स्नेहभोजन नाकारल्याचे स्पष्ट केले.
इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेत राजनाथ यांच्या भाषणावेळी भारतीय मीडियावर बंदी घालण्यात आली होती हे खरे आहे काय?, असा प्रश्न आज राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी यांनी विचारला. राजनाथ यांनी याबाबत उत्तर द्यावं, अशी मागणीही आझाद यांनी केली. त्यावर बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानकडून आपल्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे सांगितले.
'माझे भाषण कव्हर करण्यात आले किंवा नाही, याबाबत नेमकी कोणती आचारसंहिता आहे, हे सगळे जाणूनबुजून करण्यात आले का?, या तपशिलात मी जाणार नाही मात्र, माझ्यासोबत दूरदर्शन, पीटीआय आणि एएनआयचे प्रतिनिधी होते त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, हे सत्य असल्याचे राजनाथ यांनी नमूद केले.
'दुपारच्या बैठकीनंतर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते मात्र जेवणासाठी बोलावणारे गृहमंत्री स्वत:च तिथून निघून गेले होते. त्यामुळेच मी तिथे गेलो नाही. पाकिस्तानकडून अशी वागणूक मिळाल्याबद्दल मला जराही वाईट वाटलेले नाही. मी काही तिथे जेवायला गेलो नव्हतो, असेही राजनाथ यांनी नमूद केले. राजनाथ यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यावर बोलताना अशा निदर्शनांची चिंता असती तर मी पाकिस्तानात गेलोच नसतो, असे राजनाथ यांनी सुनावले.
ये पडोसी है की मानता ही नही...
भारताच्या सर्वच पंतप्रधानांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले मात्र पाकिस्तानकडून त्याला कधीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करताना 'ये पडोसी है की मानता ही नही है', असा टोला राजनाथ यांनी लगावला. भगवान पाकिस्तानला सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
'सार्क' देशांच्या परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले गृहमंत्री राजनाथ सिंह व भारतीय मीडियाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पाकिस्तान सरकारचा आज संसदेत सर्व पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी पाकिस्तानात नेमके काय घडले, अशी विचारणा केली असता राजनाथ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून देशाच्या आत्मसन्मानाला कोणताही धक्का लागू नये म्हणूनच आपण पाकिस्तानचं स्नेहभोजन नाकारल्याचे स्पष्ट केले.
इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेत राजनाथ यांच्या भाषणावेळी भारतीय मीडियावर बंदी घालण्यात आली होती हे खरे आहे काय?, असा प्रश्न आज राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी यांनी विचारला. राजनाथ यांनी याबाबत उत्तर द्यावं, अशी मागणीही आझाद यांनी केली. त्यावर बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानकडून आपल्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे सांगितले.
'माझे भाषण कव्हर करण्यात आले किंवा नाही, याबाबत नेमकी कोणती आचारसंहिता आहे, हे सगळे जाणूनबुजून करण्यात आले का?, या तपशिलात मी जाणार नाही मात्र, माझ्यासोबत दूरदर्शन, पीटीआय आणि एएनआयचे प्रतिनिधी होते त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, हे सत्य असल्याचे राजनाथ यांनी नमूद केले.
'दुपारच्या बैठकीनंतर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते मात्र जेवणासाठी बोलावणारे गृहमंत्री स्वत:च तिथून निघून गेले होते. त्यामुळेच मी तिथे गेलो नाही. पाकिस्तानकडून अशी वागणूक मिळाल्याबद्दल मला जराही वाईट वाटलेले नाही. मी काही तिथे जेवायला गेलो नव्हतो, असेही राजनाथ यांनी नमूद केले. राजनाथ यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यावर बोलताना अशा निदर्शनांची चिंता असती तर मी पाकिस्तानात गेलोच नसतो, असे राजनाथ यांनी सुनावले.
ये पडोसी है की मानता ही नही...
भारताच्या सर्वच पंतप्रधानांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले मात्र पाकिस्तानकडून त्याला कधीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करताना 'ये पडोसी है की मानता ही नही है', असा टोला राजनाथ यांनी लगावला. भगवान पाकिस्तानला सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.