लखनौ : घागरा नदीचे नाव बदलून त्यास 'सरयू' असे नाव देण्याचा निर्णयउत्तरप्रदेश सरकारने घेतला असून, राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली आहे. नामबदलाचा हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. घागरा नदी गोंडातील चांदपूर कितौली गावापासून बिहारमधील रेवालगंजपर्यंत वाहते. नदी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने नाव बदलासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते, असे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.
नदीचे नाव बदलले
घागरा नदीचे नाव बदलून त्यास 'सरयू' असे नाव देण्याचा निर्णयउत्तरप्रदेश सरकारने घेतला असून, राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 4:00 am