अ‍ॅपशहर

केंद्रीय सेवांसाठी २.२ लाख लोकांची भरती करणार

मागील काही वर्षात सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या भरतीत एकदम घट झाली आहे. आता मोदी सरकारने केंद्रीय सेवांकरिता आगामी २ वर्षात २.२ लाख लोकांची नव्याने भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. प्रामुख्याने ब आणि क श्रेणीसाठी (बी अँड सी ग्रुप) मोठ्या प्रमाणावर भरती केली जाईल.

Maharashtra Times 18 Apr 2016, 8:54 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narendra modi government to add 2 2 lakh central employees in two years
केंद्रीय सेवांसाठी २.२ लाख लोकांची भरती करणार


मागील काही वर्षात सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या भरतीत एकदम घट झाली आहे. आता मोदी सरकारने केंद्रीय सेवांकरिता आगामी २ वर्षात २.२ लाख लोकांची नव्याने भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. प्रामुख्याने ब आणि क श्रेणीसाठी (बी अँड सी ग्रुप) मोठ्या प्रमाणावर भरती केली जाईल.

उपलब्ध आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या अखत्यारितील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या ३४.९३ लाख आहे. ही संख्या १ मार्च २०१७ पर्यंत ३५.२३ लाख करण्याची सरकारची योजना आहे. रेल्वेने स्वतःचा सुरक्षा विभाग वगळता अन्य विभागांमध्ये विशेष भरती केलेली नाही, त्यामुळे रेल्वेची कर्मचारी संख्या १३ लाख २६ हजार ४३७ वर स्थिरावली आहे. मात्र नव्या भरतीमुळे सरकारच्या अनेक विभागांचा कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढणार आहे.

प्रस्तावीत योजनेनुसार, केंद्र सरकार महसूल विभागासाठी ७० हजार लोकांची भरती करणार आहे. निमलष्करी दलात ४७ हजार जवानांच्या भरतीची योजना आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील कामांसाठी ६ हजार लोकांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय सचिवालयासाठी १ मार्च २०१७ पर्यंत ३०१ जणांची भरती केली जाईल. या भरतीमुळे केंद्रीय सचिवालयातील कर्मचारी संख्या १२०१ होणार आहे. नव्या भरतीमुळे काम पूर्ण होण्याचा वेग वाढेल, असा विश्वास केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज