वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्रिवार तलाकसारखी कुप्रथा आपल्या देशात चालू राहिली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे या प्रथेला अटकाव बसला', असे नमूद करून, 'मोदी हे समाजसुधारक आहेत', असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.
येथील एका कार्यक्रमात बोलताना शहा यांनी त्रिवार तलाक हा गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ठाम समर्थन केले. 'त्रिवार तलाक प्रथेचे काँग्रेसने कित्येक दशके निलाजरेपणाने समर्थन केले. केवळ तुष्टीकरणाच्या धोरणामुळेच हे घडले', असे सांगत शहा यांनी शाहबानो खटल्यातील निकाल निष्प्रभ करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने उचललेल्या पावलांची आठवण करून दिली.
'त्रिवार तलाक गुन्हा ठरवण्याचा आमचा निर्णय़ मुस्लिमविरोधी आहे, अशी टीका होत असली तरी या निर्णयाने हिंदू, जैन वा ख्रिश्चनांना नव्हे तर मुस्लिमांनाच लाभ होणार आहे', असे शहा म्हणाले. 'मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच ही पावले आम्हाला टाकता आली', अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 'सन २०१४ मध्ये मोदी यांचे सरकार येणे ही तुष्टीकरणाच्या धोरणाच्या शेवटाचा प्रारंभ होता आणि सन २०१९च्या निकालाने तुष्टीकरणाला पूर्णविराम दिलेला आहे', असेही ते म्हणाले.
'त्रिवार तलाक हा फौजदारी नव्हे तर दिवाणी मामला आहे', असा युक्तिवाद करणाऱ्यांवर शहा यांनी टीकेची झोड उठवली. सती प्रथा बंद केली तेव्हा कुणी विरोध केला नाही, बालविवाह प्रथा बंद केली तेव्हा त्याविरोधात कुणी बोलले नाही, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
'आजवर सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी तुष्टीकरणाचा मार्ग अवलंबिला. त्यांना मुस्लिम महिलांच्या भल्याची नव्हे, तर स्वतःच्या मतपेढीची चिंता होती', अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
'काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्रिवार तलाकसारखी कुप्रथा आपल्या देशात चालू राहिली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे या प्रथेला अटकाव बसला', असे नमूद करून, 'मोदी हे समाजसुधारक आहेत', असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.
येथील एका कार्यक्रमात बोलताना शहा यांनी त्रिवार तलाक हा गुन्हा ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ठाम समर्थन केले. 'त्रिवार तलाक प्रथेचे काँग्रेसने कित्येक दशके निलाजरेपणाने समर्थन केले. केवळ तुष्टीकरणाच्या धोरणामुळेच हे घडले', असे सांगत शहा यांनी शाहबानो खटल्यातील निकाल निष्प्रभ करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने उचललेल्या पावलांची आठवण करून दिली.
'त्रिवार तलाक गुन्हा ठरवण्याचा आमचा निर्णय़ मुस्लिमविरोधी आहे, अशी टीका होत असली तरी या निर्णयाने हिंदू, जैन वा ख्रिश्चनांना नव्हे तर मुस्लिमांनाच लाभ होणार आहे', असे शहा म्हणाले. 'मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच ही पावले आम्हाला टाकता आली', अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 'सन २०१४ मध्ये मोदी यांचे सरकार येणे ही तुष्टीकरणाच्या धोरणाच्या शेवटाचा प्रारंभ होता आणि सन २०१९च्या निकालाने तुष्टीकरणाला पूर्णविराम दिलेला आहे', असेही ते म्हणाले.
'त्रिवार तलाक हा फौजदारी नव्हे तर दिवाणी मामला आहे', असा युक्तिवाद करणाऱ्यांवर शहा यांनी टीकेची झोड उठवली. सती प्रथा बंद केली तेव्हा कुणी विरोध केला नाही, बालविवाह प्रथा बंद केली तेव्हा त्याविरोधात कुणी बोलले नाही, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
'आजवर सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी तुष्टीकरणाचा मार्ग अवलंबिला. त्यांना मुस्लिम महिलांच्या भल्याची नव्हे, तर स्वतःच्या मतपेढीची चिंता होती', अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.