तामलुक:
बंगालच्या स्पीड ब्रेकर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फनी वादळावरूनही राजकारण केलं. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी त्यांना दोनदा फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
पश्चिम बंगाल येथील तामलुकमध्ये निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फनी वादळाच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळाच्या निमित्ताने भरपूर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्या फोनचीही मी वाट पाहत राहिलो. पण त्यांनी समोरूनही फोन केला नाही. त्यामुळे मी त्यांना पुन्हा फोन लावला. तरीही त्यांनी फोन घेतला नाही. त्यावरून दीदींना पश्चिम बंगालच्या जनतेपेक्षा राजकारण करण्यात मोठा रस होता हे तुमच्या लक्षात आलं असेल, असं मोदी म्हणाले.
'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी भडकल्या होत्या, त्यावरूनही मोदींनी ममतांवर टीका केली. दीदी भयभीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तरी अडचण होते. 'जय श्रीराम' म्हणणाऱ्यांना दीदी तुरुंगात टाकत असल्याची सध्याची परिस्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
'एक्सपायरी पीएम'सोबत मंचावर यायचं नव्हतं
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मोदींनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. चक्रीवादळ आल्यानंतर मी खडगपूरमध्ये वादळाचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेत होते. त्यामुळे पंतप्रधानांचा फोन घेऊ शकले नाही, असं सांगतानाच 'एक्सपायरी पीएम'सोबत मला कोणत्याही परिस्थितीत एका मंचावर यायचं नव्हतं, असा टोलाही ममता यांनी हाणला.
बंगालच्या स्पीड ब्रेकर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फनी वादळावरूनही राजकारण केलं. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी त्यांना दोनदा फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
पश्चिम बंगाल येथील तामलुकमध्ये निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फनी वादळाच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळाच्या निमित्ताने भरपूर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्या फोनचीही मी वाट पाहत राहिलो. पण त्यांनी समोरूनही फोन केला नाही. त्यामुळे मी त्यांना पुन्हा फोन लावला. तरीही त्यांनी फोन घेतला नाही. त्यावरून दीदींना पश्चिम बंगालच्या जनतेपेक्षा राजकारण करण्यात मोठा रस होता हे तुमच्या लक्षात आलं असेल, असं मोदी म्हणाले.
'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी भडकल्या होत्या, त्यावरूनही मोदींनी ममतांवर टीका केली. दीदी भयभीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तरी अडचण होते. 'जय श्रीराम' म्हणणाऱ्यांना दीदी तुरुंगात टाकत असल्याची सध्याची परिस्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
'एक्सपायरी पीएम'सोबत मंचावर यायचं नव्हतं
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मोदींनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. चक्रीवादळ आल्यानंतर मी खडगपूरमध्ये वादळाचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेत होते. त्यामुळे पंतप्रधानांचा फोन घेऊ शकले नाही, असं सांगतानाच 'एक्सपायरी पीएम'सोबत मला कोणत्याही परिस्थितीत एका मंचावर यायचं नव्हतं, असा टोलाही ममता यांनी हाणला.