नवी दिल्ली: संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यातच तिन्ही राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घोषणा करण्याचं आयोगानं टाळलं होतं. त्यासाठी आजचा दिवस निवडला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मागील वेळी १२ सप्टेंबर रोजी जाहीर होऊन आचारसंहिताही लागली होती. तुलनेनं यंदा तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर तो क्षण आला आहे. मतदान दिवाळीच्या आधी होणार की नंतर, निवडणूक नेमकी किती टप्प्यांत होणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रश्नांची उत्तरंही आज मिळणार आहेत.
ईव्हीएमद्वारेच मतदान
ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा लावून धरत निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्याची मागणी देशातील विरोधकांनी केली आहे. मात्र, निवडणुका ईव्हीएमवर घेण्यावर निवडणूक आयोग ठाम आहे. त्यामुळं निवडणूक निकालांनंतरही आरोप-प्रत्यारोप कायम राहणार, असंच चित्र आहे.
सत्ताधाऱ्यांची कसोटी, विरोधकांची अस्तित्वाची लढाई
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभाराला लोक कसा प्रतिसाद देतात हे यातून दिसणार आहे. तसंच, निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या दोन्ही राज्यांत भाजपची सरकारं आहेत. त्यांच्या कामाची पोचपावतीही या निवडणुकीतून मिळणार आहे. त्यामुळं ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी कसोटी ठरणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या झंझावातात गेल्या पाच वर्षांपासून चाचपडणाऱ्या विरोधकांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीपुढं भाजपचे मोठे आव्हान असेल. हे आव्हान दोन्ही पक्ष कसे पेलतात, हेही या निवडणुकीतून दिसणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घोषणा करण्याचं आयोगानं टाळलं होतं. त्यासाठी आजचा दिवस निवडला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मागील वेळी १२ सप्टेंबर रोजी जाहीर होऊन आचारसंहिताही लागली होती. तुलनेनं यंदा तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर तो क्षण आला आहे. मतदान दिवाळीच्या आधी होणार की नंतर, निवडणूक नेमकी किती टप्प्यांत होणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रश्नांची उत्तरंही आज मिळणार आहेत.
ईव्हीएमद्वारेच मतदान
ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा लावून धरत निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्याची मागणी देशातील विरोधकांनी केली आहे. मात्र, निवडणुका ईव्हीएमवर घेण्यावर निवडणूक आयोग ठाम आहे. त्यामुळं निवडणूक निकालांनंतरही आरोप-प्रत्यारोप कायम राहणार, असंच चित्र आहे.
सत्ताधाऱ्यांची कसोटी, विरोधकांची अस्तित्वाची लढाई
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभाराला लोक कसा प्रतिसाद देतात हे यातून दिसणार आहे. तसंच, निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या दोन्ही राज्यांत भाजपची सरकारं आहेत. त्यांच्या कामाची पोचपावतीही या निवडणुकीतून मिळणार आहे. त्यामुळं ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी कसोटी ठरणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या झंझावातात गेल्या पाच वर्षांपासून चाचपडणाऱ्या विरोधकांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीपुढं भाजपचे मोठे आव्हान असेल. हे आव्हान दोन्ही पक्ष कसे पेलतात, हेही या निवडणुकीतून दिसणार आहे.