चंदिगड / अमृतसर
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचे पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी समर्थन केले आहे. कोणी यजमान पाहुण्यांची गळाभेट घेत असेल तर हा गुन्हा नसल्याचेही सिद्धू यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू निमंत्रणानंतर उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यादरम्यान सिद्धू यांनी पाक लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतल्याने वादंग निर्माण झाला. त्यावर भारतात परतल्यानंतर सिद्धू यांनी स्पष्टीकरण देत गळाभेटीचे समर्थन केले. आपण शपथविधी सोहळ्याला गेलो असताना पाक लष्करप्रमुख बाजवा यांनी आपल्याशी संवाद साधला. पाकिस्तानमधील गुरुनानक गुरुद्वाराला ५५० वर्ष पूर्ण होत असल्याच्यानिमित्ताने करतारपूर मार्ग खुला करणार असल्याचे बाजवा यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करत आहोत. ही मागणी मान्य झाल्याचे समजल्यामुळे उत्साहाच्या भरात बाजवा यांची गळाभेट घेतली असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.
पाकिस्तान भेटीत मला तेथील लोकांचे खूप प्रेम मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी भेट झाल्यानंतर भारतीयांच्या भावना त्यांना सांगितल्या. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध अधिक चांगले होतील असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसआधीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीदेखील सिद्धूच्या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सिद्धू यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली. तर, भाजपने सिद्धू यांच्या गळाभेटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचे पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी समर्थन केले आहे. कोणी यजमान पाहुण्यांची गळाभेट घेत असेल तर हा गुन्हा नसल्याचेही सिद्धू यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू निमंत्रणानंतर उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यादरम्यान सिद्धू यांनी पाक लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतल्याने वादंग निर्माण झाला. त्यावर भारतात परतल्यानंतर सिद्धू यांनी स्पष्टीकरण देत गळाभेटीचे समर्थन केले. आपण शपथविधी सोहळ्याला गेलो असताना पाक लष्करप्रमुख बाजवा यांनी आपल्याशी संवाद साधला. पाकिस्तानमधील गुरुनानक गुरुद्वाराला ५५० वर्ष पूर्ण होत असल्याच्यानिमित्ताने करतारपूर मार्ग खुला करणार असल्याचे बाजवा यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करत आहोत. ही मागणी मान्य झाल्याचे समजल्यामुळे उत्साहाच्या भरात बाजवा यांची गळाभेट घेतली असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.
पाकिस्तान भेटीत मला तेथील लोकांचे खूप प्रेम मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी भेट झाल्यानंतर भारतीयांच्या भावना त्यांना सांगितल्या. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध अधिक चांगले होतील असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसआधीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीदेखील सिद्धूच्या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सिद्धू यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली. तर, भाजपने सिद्धू यांच्या गळाभेटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा