अ‍ॅपशहर

naxal attack : नक्षलवादी हल्ल्याने बिहार हादरलं; गयामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची केली हत्या

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. बिहारच्या गया जिल्ह्यातील एका गावात नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. गावातील एका कुटुंबातील चौघांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आणि त्यांचे घर स्फोटाने उडवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2021, 2:21 pm
गयाः बिहारमधील गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या एका गटाने गावात हल्ला करून चार जणांची हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून मृतांचे घरही उडवले. नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हा हल्ला केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम naxalite attack in gaya bihar killed 4 persons in one family
नक्षलवादी हल्ल्याने बिहार हादरलं; गयामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची केली हत्या


एकाच कुटुंबातील चौघांची केली हत्या

ही मोठी घटना गया जिल्ह्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त भाग असलेल्या डुमरिया पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथील मोनबार गावात शनिवारी रात्री मोठ्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गावातील रहिवासी सरजू सिंग भोक्ता यांचे घर नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते. नक्षलवाद्यांनी घराला घेरले. यानंतर सरजू भोक्ता यांची दोन मुले सत्येंद्र सिंग भोक्ता, महेंद्रसिंग भोक्ता, पत्नी आणि एका महिलेला नक्षलवाद्यांनी घराबाहेर फासावर लटकवत त्यांची निर्घृण हत्या केली.

नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून घर उडवले

चौघांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॉम्बने घरही उडवले. यानंतर नक्षलवाद्यांनी गावात एक पत्रकही सोडले आहे. भोक्ताच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी चार नक्षलवाद्यांना विष देऊन ठार केले. ते चकमकीत ठार झाले नाहीत, असे नक्षलवाद्यांनी पत्रकात लिहिले आहे. अमरेश कुमार, सीता कुमार, शिवपूजन कुमार आणि उदय कुमार या मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या नावांचाही या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे.

manipur ambush : 'कर्नल कुटुंबासोबत होते हे माहिती नव्हतं', मणिपूरमधील हल्ल्याची जबाबदारी

पोलीस घटनास्थळी पोहोचले

या मोठ्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि माओवाद्यांचे पत्रक जप्त करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले.

Terror Attack: मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; लष्करी अधिकाऱ्यासह संपूर्ण कुटुंब शहीद

२६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या जंगलात केलेल्या कारवाईत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत ३ कमांडो जखमी झाले. मार्डीनटोला जंगलात नक्षलवादी असल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज