अ‍ॅपशहर

माओवाद्यांचा गडचिरोली बंद, ट्रक पेटवला

एप्रिल महिन्यातील चकमकीच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज गडचिरोली बंद पुकारून काही ठिकाणी हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न केला. माओवाद्यांनी एटापल्ली ते आलापल्ली दरम्यानचा रस्ता बंद केला असून गुरुपल्लीजवळ एका वखारीतील ट्रकही पेटवून दिला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 12:40 pm
गडचिरोली: एप्रिल महिन्यातील चकमकीच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज गडचिरोली बंद पुकारून काही ठिकाणी हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न केला. माओवाद्यांनी एटापल्ली ते आलापल्ली दरम्यानचा रस्ता बंद केला असून गुरुपल्लीजवळ एका वखारीतील ट्रकही पेटवून दिला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम truck1


२७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या विरोधात माओवाद्यांनी आज गडचिरोली बंद पुकारला आहे. आजचा बंद आणि १ मेपासून नक्षलवाद्यांनी केलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या सीमाभागांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नक्षलवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एटापल्ली ते आलापल्ली मार्गावरील झाड तोडून हा मार्ग बंद केला. त्यामुळे एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणाऱ्या बसेस एटापल्लीतच खोळंबल्या आहेत. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी वनविभागाची लाखो रुपयांची लाकडे पेटवून दिली असून येथील एका वखारीतील ट्रकही पेटवून दिली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील कालेश्वर मेडीगड्डा प्रकल्पाला भेट देणार असल्याने तेलंगणाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. तर दुर्गम भागातल्या पोलीस ठाण्यांच्या सुरक्षा बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून सतर्कतेच्या सूचना पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज