अ‍ॅपशहर

‘मेहबूबांची वक्तव्ये वादात तेल ओतणारी’

पाकिस्तानवर बॉम्बहल्ला करण्याचा विचार भाजपने व्यक्त केल्यामुळे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा करत विरोधीपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी सभात्याग केला.

Maharashtra Times 29 Jun 2016, 8:05 am
ईटी वृत्त, श्रीनगरः पाकिस्तानवर बॉम्बहल्ला करण्याचा विचार भाजपने व्यक्त केल्यामुळे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा करत विरोधीपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी सभात्याग केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nc targets mehbooba mufti for putting imams under surveillance
‘मेहबूबांची वक्तव्ये वादात तेल ओतणारी’


‘मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट करावे की त्या चर्चेच्या बाजूने आहेत की, गोळ्यांच्या. युद्धाची धग नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला बसणार नाही. पण सीमाभागातील निष्पाप नागरिकांचे आयुष्य उध्वस्त करेल,’ अशी बोचरी टीका आमदार देवेंदर राणा यांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर पोलिसांना शुक्रवारच्या नमाजावरही पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यावरही नॅशनल कॉन्फरन्सने टीका केली.

मेहबूबा यांची इस्लामविरोधी वक्तव्ये इस्लामोफोबियामध्ये तेलच ओतत आहेत. त्यांना मुस्ल‌मिांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही, असे नॅशनल काँग्रेसचे प्रवक्ते जुनैद अझिन मट्टू यांनी म्हटले आहे.

लष्कर-ए-तोयबाने गेल्या आठवड्यात केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले होते तर २२ जण जखमी झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्व चर्चा थांबवून पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी केली होती. भाजपच्या या वक्तव्यामुळे सीमाभागातील कलाकोटे, दालमिआ आण‌ि पुंछ या गावांत राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, असेही राणा म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज