नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीवर विविध सर्वेक्षण संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली असताना एनडीएच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण असून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला एनडीएच्या सर्वच मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज राजधानी दिल्लीत हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या नेत्यांकडून शाल देवून सन्मानित करण्यात आले. बैठकीनंतर जंगी 'डीनर पार्टी'ही रंगली.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे अध्यक्ष नितीशकुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, सुखबीरसिंग बादल, उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आदि उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील. २३ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल एनडीएच्या बाजूनेच लागेल व केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे पूर्ण बहुमतातील सरकार सत्तेत येईल, असे मत मित्रपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केले.
प्रचार नव्हे तीर्थयात्रा: मोदी
एनडीएच्या बैठकीआधी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 'स्वागत व आभार' संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी यावेळच्या लोकसभेच्या प्रचाराची तुलना तीर्थयात्रेशी केली. ही निवडणूक राजकारणापलीकडची होती. खऱ्या अर्थाने जनताच ही निवडणूक लढली. मी अनेक विधानसभा, लोकसभा निवडणुकांचा प्रचार केला मात्र यावेळी प्रचारदौरे करताना एखादी तीर्थयात्राच करत आहे, असे मला वाटल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माध्यमांना दिली.
लोकसभा निवडणुकीवर विविध सर्वेक्षण संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली असताना एनडीएच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण असून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला एनडीएच्या सर्वच मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज राजधानी दिल्लीत हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या नेत्यांकडून शाल देवून सन्मानित करण्यात आले. बैठकीनंतर जंगी 'डीनर पार्टी'ही रंगली.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री व जदयुचे अध्यक्ष नितीशकुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, सुखबीरसिंग बादल, उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आदि उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील. २३ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल एनडीएच्या बाजूनेच लागेल व केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे पूर्ण बहुमतातील सरकार सत्तेत येईल, असे मत मित्रपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केले.
प्रचार नव्हे तीर्थयात्रा: मोदी
एनडीएच्या बैठकीआधी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 'स्वागत व आभार' संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी यावेळच्या लोकसभेच्या प्रचाराची तुलना तीर्थयात्रेशी केली. ही निवडणूक राजकारणापलीकडची होती. खऱ्या अर्थाने जनताच ही निवडणूक लढली. मी अनेक विधानसभा, लोकसभा निवडणुकांचा प्रचार केला मात्र यावेळी प्रचारदौरे करताना एखादी तीर्थयात्राच करत आहे, असे मला वाटल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माध्यमांना दिली.