अ‍ॅपशहर

धक्कादायक घटना! ३०० भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारले

भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे एका गावाने जवळपास ३०० कुत्र्यांना मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2021, 3:09 pm
पश्चिम गोदावरीः आंध्र प्रदेशातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ( west godavari ) लिंगापालम गावातील पंचायत सदस्यांनी जवळपास ३०० कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन ( nearly 300 stray dogs killed ) मारलं. यानंतर गावाजवळी एका तलावजवळ मोठा खड्डा खोदून तिथे कुत्र्यांना पुरलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nearly 300 stray dogs killed with poisonous injections in west godavari of andhra pradesh
आंध्रात धक्कादायक घटना! ३०० भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारले ( फोटो- प्रातिनिधिक )


प्राणी हक्क कार्यकर्ते चल्लाप्पल्ली श्रीलता यांनी पोलीस ठाण्यात २९ जुलैला तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झालं. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ग्राम पंचायत सचिव आणि सरपंचांविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.

कुत्र्यांमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास होत होता. यामुळे गावातील पंचायतीने कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला. गावाला भेट दिल्यावर तलावाजवळ आपल्याला मोठ्या संख्येत मेलेले कुत्रे आढळून आले. पंचायतीच्या निर्णयावरून कुत्र्यांना मारलं गेलं, असं ग्रामस्थानी सांगितल्याचं श्रीलता म्हणाल्या.

Corona Vaccination: एकाच व्यक्तीला चार वेळा करोना लस, बिहार आरोग्य प्रशासनाचा प्रताप

कर्नाकात ३६ माकडं मारली

आंध्रातील या घटनेआधी कर्नाटकच्या हास जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ३६ माकडं मेलेली आढळून आली. विष देऊन त्यांना मारण्यात आलं आणि गोण्यांमध्ये भरून त्यांना बेलूर भागात फेकून दिलं. ही सर्व माकडं बोनेट मकाक जातीची होती. ही माकडं दक्षिण भारतात आढळून येतात. या प्रकरणी तपास सुरू आहे.

जम्मू काश्मीर : दंगेखोरांना पासपोर्ट-सरकारी नोकरी मिळणार नाही

महत्वाचे लेख