म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह सर्व विमान कंपन्यांनी हवाईबंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी शिवसेना आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. त्याचवेळी दिल्लीला परतण्यासाठी आतूर झालेल्या गायकवाड यांनी काढलेले बुधवारचे तिकीट एअर इंडियाने पुन्हा रद्द केले आहे. गायकवाड यांच्या या उतावळेपणामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही वैतागले आहेत.
विमानात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी २०१४ मध्ये केंद्र सरकारने नागरी उड्डाण महासंचालनालयाला अधिकार दिले होते. त्या अधिकारांच्या आधारे रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासह सहा खासगी कंपन्यांनी घेतला आहे. ज्या अधिकाराच्या आधारे ही बंदी घातली ती कोणत्या मार्गाने उठवायची यावरून नागरी उड्डाण मंत्रालयात खल सुरू आहे.
लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते या नात्याने आनंदराव अडसूळ यांनी एअर इंडियाविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. बिझनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनॉमी क्लासने प्रवास करावा लागलेल्या गायकवाड आणि एअर इंडियादरम्यानच्या वादाचा निपटारा व्हायला वेळ लागेल. पण गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी ही खासदारांच्या अधिकारांना दिलेले गंभीर आव्हान आहे. सभागृहाच्या आणि खासदारांच्या विशेषाधिकारांचे हनन होऊ नये यासाठी लोकसभा अध्यक्षांना व्यापक अधिकार लाभले आहेत. सभागृहात किंवा सभागृहाबाहेर खासदारांच्या अधिकारांवर गदा येत असल्यास लोकसभा अध्यक्ष योग्य कारवाई करू शकतात. विमान कंपन्यांना काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्यांनी नागरी उड्डाणमंत्र्यांचे या मुद्याकडे लक्ष वेधायला हवे होते. विमान कंपन्यांनी अधिकारांचे उल्लंघन करण्याचा हा उघडउघड प्रकार असल्याची टीका अडसूळ यांनी या हक्कभंग प्रस्तावात केली आहे. ही मागणी आपल्या विचाराधीन असल्याचे मंगळवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी नाराज
पंतप्रधान मोदींकडे तक्रार करेन अशी धमकी दिल्यामुळे संतापून आपण एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला २५ वेळा सँडलने मारल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्या विधानामुळे पंतप्रधान मोदीही नाराज झाल्याचे समजते.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह सर्व विमान कंपन्यांनी हवाईबंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी शिवसेना आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. त्याचवेळी दिल्लीला परतण्यासाठी आतूर झालेल्या गायकवाड यांनी काढलेले बुधवारचे तिकीट एअर इंडियाने पुन्हा रद्द केले आहे. गायकवाड यांच्या या उतावळेपणामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही वैतागले आहेत.
विमानात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी २०१४ मध्ये केंद्र सरकारने नागरी उड्डाण महासंचालनालयाला अधिकार दिले होते. त्या अधिकारांच्या आधारे रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासह सहा खासगी कंपन्यांनी घेतला आहे. ज्या अधिकाराच्या आधारे ही बंदी घातली ती कोणत्या मार्गाने उठवायची यावरून नागरी उड्डाण मंत्रालयात खल सुरू आहे.
लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते या नात्याने आनंदराव अडसूळ यांनी एअर इंडियाविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. बिझनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनॉमी क्लासने प्रवास करावा लागलेल्या गायकवाड आणि एअर इंडियादरम्यानच्या वादाचा निपटारा व्हायला वेळ लागेल. पण गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी ही खासदारांच्या अधिकारांना दिलेले गंभीर आव्हान आहे. सभागृहाच्या आणि खासदारांच्या विशेषाधिकारांचे हनन होऊ नये यासाठी लोकसभा अध्यक्षांना व्यापक अधिकार लाभले आहेत. सभागृहात किंवा सभागृहाबाहेर खासदारांच्या अधिकारांवर गदा येत असल्यास लोकसभा अध्यक्ष योग्य कारवाई करू शकतात. विमान कंपन्यांना काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्यांनी नागरी उड्डाणमंत्र्यांचे या मुद्याकडे लक्ष वेधायला हवे होते. विमान कंपन्यांनी अधिकारांचे उल्लंघन करण्याचा हा उघडउघड प्रकार असल्याची टीका अडसूळ यांनी या हक्कभंग प्रस्तावात केली आहे. ही मागणी आपल्या विचाराधीन असल्याचे मंगळवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी नाराज
पंतप्रधान मोदींकडे तक्रार करेन अशी धमकी दिल्यामुळे संतापून आपण एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला २५ वेळा सँडलने मारल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्या विधानामुळे पंतप्रधान मोदीही नाराज झाल्याचे समजते.