नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत लोकं दूषित हवा आणि पाण्यामुळे मरत आहेत. मग मला फाशी का देत आहात? असा हस्यास्पद प्रश्न निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय सिंह याने केला आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेत हा हस्यास्पद मुद्दा मांडला आहे.
दिल्लीतील हवा-पाणी दूषित आहे. त्यामुळे लोक जास्त जगत नाहीत. मग मृत्यूदंडाच्या शिक्षेची गरज काय? दिल्लीत असे बरेच लोक आहेत की जे ८०-९० वर्षापर्यंतही जगत नाहीत, असं अक्षयने म्हटलं आहे. माणूस जेव्हा आयुष्यात विपरीत परिस्थितीचा सामना करत असतो तेव्हा तो प्रेतासारखाच झालेला असतो. दिल्लीचं गॅस चेंबरमध्ये रुपांतर झालं आहे. भारत सरकारच्या अहवालातच तसं नमूद करण्यात आलं आहे. दिल्लीची हवा आणि पाणीही प्रदूषित झाल्याचं प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे आयुर्मानही कमी होत असल्याने फाशी देण्याची गरजच उरलेली नाही, असंही त्यानं या याचिकेत म्हटलं आहे.
या याचिकेत त्याने महात्मा गांधी यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गरीब माणसाचा विचार करा. तुमच्या निर्णयामुळे त्या व्यक्तिला कसा लाभ होईल, याचा विचार करा, असं महात्मा गांधी म्हणायचे. मला वाटतं तुम्हीही असा विचार केला तर तुमचे सर्व भ्रम दूर होतील, असं त्यानं नमूद केलं आहे.
निर्भया कांड:आरोपीची दयेची याचिका
'निर्भया'प्रकरणी लवकरच फाशी?
दरम्यान, निर्भया हत्याकांडातील एक आरोपी विनय याने राष्ट्रपतींकडे पाठवलेला दयेची याचिका मागे घेतली आहे. आपण राष्ट्रपतींकडे दयेची याचिकाच केली नव्हती, असं सांगत त्याने ही याचिका मागे घेतली आहे.
निर्भया बलात्कारातील गुन्हेगारांना १६ डिसेंबर रोजी फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. कारण, राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर दोषींना १४ दिवसांची मुदत दिली जावी, असं एका आदेशात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्याबाबतही माहिती घेतली जात आहे. हा आदेश या प्रकरणात लागू होत नसल्यास दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीची तयारी; १०० किलोच्या डमीला लटकवले!
दिल्लीतील हवा-पाणी दूषित आहे. त्यामुळे लोक जास्त जगत नाहीत. मग मृत्यूदंडाच्या शिक्षेची गरज काय? दिल्लीत असे बरेच लोक आहेत की जे ८०-९० वर्षापर्यंतही जगत नाहीत, असं अक्षयने म्हटलं आहे. माणूस जेव्हा आयुष्यात विपरीत परिस्थितीचा सामना करत असतो तेव्हा तो प्रेतासारखाच झालेला असतो. दिल्लीचं गॅस चेंबरमध्ये रुपांतर झालं आहे. भारत सरकारच्या अहवालातच तसं नमूद करण्यात आलं आहे. दिल्लीची हवा आणि पाणीही प्रदूषित झाल्याचं प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे आयुर्मानही कमी होत असल्याने फाशी देण्याची गरजच उरलेली नाही, असंही त्यानं या याचिकेत म्हटलं आहे.
या याचिकेत त्याने महात्मा गांधी यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गरीब माणसाचा विचार करा. तुमच्या निर्णयामुळे त्या व्यक्तिला कसा लाभ होईल, याचा विचार करा, असं महात्मा गांधी म्हणायचे. मला वाटतं तुम्हीही असा विचार केला तर तुमचे सर्व भ्रम दूर होतील, असं त्यानं नमूद केलं आहे.
निर्भया कांड:आरोपीची दयेची याचिका
'निर्भया'प्रकरणी लवकरच फाशी?
दरम्यान, निर्भया हत्याकांडातील एक आरोपी विनय याने राष्ट्रपतींकडे पाठवलेला दयेची याचिका मागे घेतली आहे. आपण राष्ट्रपतींकडे दयेची याचिकाच केली नव्हती, असं सांगत त्याने ही याचिका मागे घेतली आहे.
निर्भया बलात्कारातील गुन्हेगारांना १६ डिसेंबर रोजी फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. कारण, राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर दोषींना १४ दिवसांची मुदत दिली जावी, असं एका आदेशात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्याबाबतही माहिती घेतली जात आहे. हा आदेश या प्रकरणात लागू होत नसल्यास दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीची तयारी; १०० किलोच्या डमीला लटकवले!