अ‍ॅपशहर

तेजस्वी यादव यांची हकालपट्टी होणार

राष्ट्रीय जनता दलाचे नेते, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे बिहार सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा विरोधक उचलून धरणार असल्याने सरकार समोर अडचणी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचं अधिवेश सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार स्वत:हून कारवाई करणार असून तेजस्वी यांना कोणत्याहीक्षणी बडतर्फ केले जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.

Maharashtra Times 26 Jul 2017, 12:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitish kumar may act against lalus son tejashwi before assembly session
तेजस्वी यादव यांची हकालपट्टी होणार


राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे बिहार सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा विरोधक उचलून धरणार असल्याने सरकार समोर अडचणी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यांच्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार स्वत:हून कारवाई करणार असून तेजस्वी यांना कोणत्याही क्षणी बडतर्फ केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

राजद नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजदने आज एका बैठकीचे आयोजन केले आहे. तर तेजस्वी यादव यांना बडतर्फ केल्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संयुक्त जनता दलानेही वेगळ्या बैठकीचे आयोजन केले आहे. सत्तेत भागीदार असलेल्या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केल्याने आज सायंकाळपर्यंतच बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांचं म्हणंण आहे.

सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसावा म्हणून नितीश कुमार विशेष काळजी घेत आहेत. त्यातच तेजस्वी यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेचं प्रकरणं उभं राहिलं असून तेजस्वी यांनी उत्पन्नाचा सोर्सही उघड केलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार अडचणीत आले आहेत. विधानसभेत या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत देण्यापूर्वीच तेजस्वी यांच्याविरोधात नितीश कुमार कारवाई करण्याची शक्यता आहे. स्वच्छ प्रतिमा कायम ठेवण्यासाठीच नितीश कुमार हे पाऊल उचलणार असल्याचं जेडीयुचे महासचिव के. सी. त्यागी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.

तेजस्वी यांनी कोणत्याही ज्येष्ठ नेत्याकडे आरोपांचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. आम्हाला आमच्या महाआघाडीला यूपीए-२ बनवायचं नाही, अशा शब्दांत बिहारमधील आगामी राजकीय परिस्थितीचे संकेतच त्यागी यांनी दिले. यूपीए-२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज