अ‍ॅपशहर

मोदी हे गुजराती नव्हे, NRI PM: हार्दिक

गुजरातमधील पटेल समूहासाठी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. सतत परदेश दौऱ्यांवर जाणारे पंतप्रधान मोदी हे आता गुजरातचे राहिले नसून ते ‘एनआरआय पीएम’ झाले असल्याची टिका हार्दिकनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

Maharashtra Times 23 Jul 2016, 3:12 pm
गीता सुनील पिल्लई । जयपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no longer from gujarat modi is an nri pm hardik patel
मोदी हे गुजराती नव्हे, NRI PM: हार्दिक


गुजरातमधील पटेल समूहासाठी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. सतत परदेश दौऱ्यांवर जाणारे पंतप्रधान मोदी हे आता गुजरातचे राहिले नसून ते ‘एनआरआय पीएम’ झाले असल्याची टिका हार्दिकनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. ‘देशद्रोहा’च्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला हार्दिक सध्या जामिनावर असून न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातबाहेर राजस्थानच्या उदयपूर शहरात राहतोय.

‘पटेलांचं आंदोलन चिरडण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत गुप्तचर यंत्रणेचाही गैरवापर केला जातोय. आमच्या आंदोलकांचे फोन टॅप केले जात आहेत. पंतप्रधान मोदी कधीकाळी बिहारमध्ये जंगल राज असल्याचं सांगत हिणवायचे. आता तर त्यांच्या गुजरातमध्येच जंगल राज पसरलंय’, असा घणाघाती आरोप हार्दिकनं केला. लोक या घटनांकडे निमूटपणे बघत असले तरी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना नक्कीच धडा शिकवेल. राजकीय पक्ष किंवा सरकार देश चालवत नसतात. तर जनताच सरकारं बनवते आणि देशही चालवते, असं हार्दिक या मुलाखतीत सांगितलं.

पाटीदार समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. आरक्षणामुळं कोणत्याही समाजात फूट पडलेली नाही. खरी फूट हे राजकीय नेते त्यांच्या स्वर्थासाठी पाडत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लोकांमध्ये फूट पाडणारे ब्रिटीश बरे होते असं म्हणण्याची वेळ आलीय, असंही हार्दिक यावेळी म्हणाला. कोणत्याही पक्षात सामिल होण्याचा माझा इरादा नसून शेतकरी, तरुण आणि महिलांच्या प्रश्नांसाठी लढायचं आहे. लोक रस्त्यावर आले तर परिस्थितीत बदल होईल यावर विश्वास असल्याचं आहे हार्दिकनं सांगितलं.

गुजरात सरकारने देशद्रोहासारखा गंभीर आरोप लावल्यामुळे हार्दिक प्रचंड संतापला आहे. लालकृष्ण अडवाणींनी रथ यात्रा काढली होती. त्या वेळी यात्रेमुळं देशातली शांतता धोक्यात आली, तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नव्हते. काश्मीर, गोध्रा, दादरी कांड अगदी झाकीर नाईकवरसुद्धा देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही. मग माझ्यावरच का? मी देशाविरोधात असा कोणता द्रोह केला होता, असा सवाल हार्दिकनं केला.

देशद्रेहाच्या आरोपांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास मी १४ वर्षांची शिक्षा भोगायला तयार आहे. सध्या मी २३ वर्षाचा आहे. शिक्षा पूर्ण केल्यानंतर ३६ वर्षांचा होऊन जेलमधून बाहेर येईन. ज्या देशात ८० वर्षाचे वृद्ध नेते देखील पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात तिथं माझ्याजवळ तर खूप मोठा वेळ असेल, असं हार्दिक म्हणाला.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेले नाही. परंतु राजस्थान पोलीस आपल्याला बाहेर पडू देत नसल्याचं तो म्हणाला. याबाबत उदयपूरचे पोलीस महासंचालक आणि अधिक्षकांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितलं असल्याचं हार्दिक म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज