अ‍ॅपशहर

आरक्षणावर कोणत्याही चर्चेची गरज नाहीः पासवान

आरक्षण हे समाजातील पीडित, दलित, शोषित वर्गासाठी संविधानिक अधिकार आहे, त्यामुळे आरक्षणावर कोणत्याही चर्चेची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन भाजपचे मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणावर उपस्थित केलेल्या प्रश्नावरून सध्या वाद होत आहे. भागवतांच्या वक्तव्यानंतर बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भाजप व आरएसएसवर टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 7:42 pm
नवी दिल्ली ः आरक्षण हे समाजातील पीडित, दलित, शोषित वर्गासाठी संविधानिक अधिकार आहे, त्यामुळे आरक्षणावर कोणत्याही चर्चेची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन भाजपचे मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणावर उपस्थित केलेल्या प्रश्नावरून सध्या वाद होत आहे. भागवतांच्या वक्तव्यानंतर बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भाजप व आरएसएसवर टीका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paswan


सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात आरक्षणावर भाष्य करताना म्हटले होते की, आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात एक चर्चा व्हायला हवी. भागवत यांच्या या विधानानंतर मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. आरक्षण हे मानवतावादी संविधानिक व्यवस्था आहे त्यामुळे 'आरएसएस'ने आपली आरक्षणविरोधी मानसिकता सोडून द्यावी, असेही मायावती यांनी म्हटले होते. मायावती यांच्यानंतर दलित नेते अशी ओळख असलेल्या रामविलास पासवान यांची प्रतिक्रिया आली आहे. आरक्षण हे संविधानिक अधिकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संविधानात कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे सध्या आरक्षणावर कोणत्याची चर्चेची गरज नाही, असे पासवान म्हणाले.

आरक्षणावर भागवत काय बोलले याविषयी मला सविस्तर माहिती नाही, असे सांगत रामविलास पासवान यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर थेट बोलणे टाळले. आरक्षणावरून विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोपही पासवान यांनी यावेळी केला.

RSS ने आरक्षणविरोधी मानसिकता सोडावीः मायावती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज