अ‍ॅपशहर

राम मंदिर बनणार नाही, असं कुणीच म्हणणार नाही

एकेकाळी अनेक लोक आयोध्येत ग्रंथालय, रूग्णालय किंवा शौचालय बनविणायाचा सल्ला देत होते. परंतू देशातील सर्व लोक आता आयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आयोध्येत राम मंदिर बनणार नाही, असं कुणीच म्हणणार नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी सांगितलं.

Maharashtra Times 29 Oct 2017, 9:11 am
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no one can say that temple will not be built says krishna gopal
राम मंदिर बनणार नाही, असं कुणीच म्हणणार नाही


एकेकाळी अनेक लोक आयोध्येत ग्रंथालय, रूग्णालय किंवा शौचालय बनविणायाचा सल्ला देत होते. परंतू देशातील सर्व लोक आता आयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आयोध्येत राम मंदिर बनणार नाही, असं कुणीच म्हणणार नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी सांगितलं.

इंदिरा गांधी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले, '८० च्या दशकातच 'पांचजन्य' साप्ताहिकाने वादग्रस्त जागेवरच मंदिर बनविलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती. समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे याचा आग्रहही 'पांचजन्य'नेच धरला होता. आज सर्वोच्च न्यायालय आमच्या या भूमिकेचा पुरस्कार करत आहे. काश्मीरमध्ये लागू असलेल्या अनुच्छेद ३७० च्या विरोधात 'पांचजन्य'नेच आवाज उठविला होता. हे अनुच्छेदच काश्मीरच्या समस्येला कारणीभूत असून ते हटविले गेले पाहिजे अशी आमची आजही भूमिका कायम आहे'.

'मंदिराला विरोध करणारे आता स्वत: मंदिरांमध्ये जात आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते मंदिरात जात आहेत. देवासमोर नतमस्तक होत आहेत. पण मनापासून भक्ती करत नाहीत. केवळ मताच्या लालसेपोटी असं करत आहेत', असा टोलाही त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता लगावला. 'साम्यवादी व्यवस्थेला लोक कंटाळले आहेत. केवळ चार-पाच देशांतच मार्क्सवाद आहे. पण तिथले लोकही वैतागलेले आहेत. भांडवलशाहीही धोकादायक आहे', असं त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज