वाराणसी:
देशभरातील विविध घटनांवर बेताल आणि वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटाच भाजप नेते आणि मंत्र्यांनी लावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत विधान करून वादाला तोंड फोडले आहे. '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठी चार लोकही मिळणार नाहीत,' असं चौबे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत १५ मिनिटेही बोलू शकत नाहीत, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल यांना लक्ष्य केलं. चौबेंनीही राहुल यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी 'शेर' आहेत आणि राहुल यांनी 'सव्वा शेर' बनण्याचा प्रयत्न करू नये. राहुल संसदेत गप्प का बसतात? त्यांच्या वक्तव्यांमध्ये कोणतंही तथ्य असतं का? असे सवालही चौबे यांनी उपस्थित केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल यांना स्मशानात पोहोचवण्यासाठी चार लोकही मिळणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं. या विधानावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांनी चौबे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवला.
देशभरातील विविध घटनांवर बेताल आणि वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटाच भाजप नेते आणि मंत्र्यांनी लावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत विधान करून वादाला तोंड फोडले आहे. '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठी चार लोकही मिळणार नाहीत,' असं चौबे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत १५ मिनिटेही बोलू शकत नाहीत, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल यांना लक्ष्य केलं. चौबेंनीही राहुल यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी 'शेर' आहेत आणि राहुल यांनी 'सव्वा शेर' बनण्याचा प्रयत्न करू नये. राहुल संसदेत गप्प का बसतात? त्यांच्या वक्तव्यांमध्ये कोणतंही तथ्य असतं का? असे सवालही चौबे यांनी उपस्थित केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल यांना स्मशानात पोहोचवण्यासाठी चार लोकही मिळणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं. या विधानावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांनी चौबे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवला.