अ‍ॅपशहर

‘ईशान्य भारताला व्यापारी केंद्र बनविणार’

ईशान्य भारताला आग्नेय आशियातील व्यापारी केंद्र बनविण्यासाठी देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.

Maharashtra Times 27 May 2017, 6:53 am
वृत्तसंस्था, सादिया (आसाम)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम northeast india to become commercial center
‘ईशान्य भारताला व्यापारी केंद्र बनविणार’


ईशान्य भारताला आग्नेय आशियातील व्यापारी केंद्र बनविण्यासाठी देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील प्रवासाचा वेळ पाच तासांनी कमी करणाऱ्या देशातील सर्वांत लांब पुलाचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या पुलाला आसामचे भूमिपुत्र आणि प्रतिभावंत संगीतकार भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात आले आहे. लोहित नदीवर बांधण्यात आलेला हा पूल सादिया शहर आणि ढोला गाव यांना जोडतो. त्याची लांबी ९.५ किलोमीटर असून, ती मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूपेक्षाही अधिक आहे. ईशान्येतील दळणवळण वाढून या भागाला आग्नेय आशियातील व्यापारी केंद्र बनविण्याची माझी इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांचा विकास करणार आहोत आणि ईशान्य भारताला पर्यटन केंद्र बनवणार आहोत. कामाख्य मंदिर पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतील. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले. वीज, रस्ते, रेल्वे, ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारण्याचे काम पूर्वी कधीही झालेले नाही. या जाळ्यामुळे ईशान्य भारतातील कानाकोपरा देशाच्या इतर भागाशी जोडला जाईल, असेही मोदी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज