नवी दिल्ली : 'अखंड भारताचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी कलम ३७० रद्द करणे हे पहिले पाऊल होते. आता दुसरे पाऊल पाकिस्तान व्याप्त काश्मीर परत मिळवणे हेच असेल,' असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले आहे. ते येथे छात्र संसदेत बोलत होते. अखंड भारताचे स्वप्न कसे साकार होणार असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्याने विचारले. त्यावर माधव म्हणाले, 'टप्प्याटप्प्याने ते घडेल. पहिला टप्पा जम्मू काश्मीरला भारताशी जोडणे हा होता. आता व्याप्त काश्मीर परत मिळवणे हे आमचे पुढचे उद्दिष्ट आहे.
आता लक्ष्य 'पीओके'
'अखंड भारताचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी कलम ३७० रद्द करणे हे पहिले पाऊल होते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2020, 4:00 am