अ‍ॅपशहर

titli cyclonic: 'तितली'चा कहर; आंध्रात ८ ठार, ओडिशात अतिवृष्टी

ओडिशा आणि आंध्रप्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या तितली वादळामुळे आंध्रात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या वादळामुळे ओडिशात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये हाहाकार माजला असून रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2018, 8:02 pm
भुवनेश्वर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम titli


ओडिशा आणि आंध्रप्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या तितली वादळामुळे आंध्रात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या वादळामुळे ओडिशात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये हाहाकार माजला असून रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओडिशाच्या गोपालपूरमध्ये आलेल्या या वादळामुळे मच्छिमारांची एक नाव बुडाली. त्यात पाच मच्छिमार होते. सुदैवाने या मच्छिमारांना वाचवण्यात यश आले आहे. तर आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात वादळामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. सध्या हे वादळ उत्तर आंध्रप्रदेशातून आणि दक्षिण ओडिशातून पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले आहे. ओडिशात येत्या १२ तासांत जोरदार वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ओडिशातील तीन लाख लोकांना तटवर्ती प्रदेशातून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

दरम्यान, या वादळाने ओडिशा आणि आंध्रप्रदेशात दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडले आहेत. दूरसंचार यंत्रणाही ठप्प झाल्या असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफच्या जवानांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज