म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशव्यापी लॉकडाउनच्या ५०व्या दिवसात बुधवारी देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या पाऊण लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी जवळजवळ एकतृतीयांश रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात करोनाग्रस्तांच्या चाचण्यांची संख्याही आता दिवसाला एक लाखाच्या आकड्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. गेल्या २४ तासांत ९४ हजार ६७१ संशयित करोनाग्रस्तांच्या चाचण्यांची नोंद करण्यात आली.
देशभरात आजवरच्या करोनाग्रस्तांची संख्या ७४ हजार २८१ झाली आहे. त्यापैकी २४ हजार ३८६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ३२.८२ आहे. २४ तासात १,९३२ रुग्ण बरे झाले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ४८० इतकी असून गेल्या २४ तासात करोनाच्या ३५२५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत १२२ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा २४१५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ३५६ सरकारी आणि १४६ खासगी प्रयोगशाळांमध्ये १८ लाख ५४ हजार २५० करोनाग्रस्तांच्या चाचण्या झाल्या आहेत.
६४२.७ लाख टन गहू-तांदळाचा साठा
देशव्यापी लॉकडाउनला ५० दिवस पूर्ण होत आले असताना भारतीय अन्न महामंडळाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत विविध योजनांखाली १५९.३६ लाख टन अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. राज्यांनी करोना संकटाच्या काळात ६०.८७ लाख टन धान्याची उचल केली. पंतप्रधान ग्रामीण कल्याण योजनेंतर्गत ७९.७४ लाख टन धान्याची उचल करण्यात आली आहे. १ मे २०२० रोजी देशात ६४२.७ लाख टन गहू आणि तांदळाचा साठा होता. त्यात २८५.०३ लाख टन तांदूळ, तर ३५७.७ लाख टन गव्हाचा समावेश आहे.
बहुतांश जिल्हे असुरक्षित
नवी दिल्ली : बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातमधील बहुतांश जिल्हे करोना संकटात असुरक्षित असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. केवळ इतकेच नव्हे; तर या राज्यांच्या शेजारी असलेल्या राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्हेही वेगवान संसर्गामध्ये आघाडीवर राहतील, अशा इशाराही संबंधित संस्थेने दिला आहे. 'स्वस्ती' या संस्थेने विविध आकडेवारी व जागतिक निर्देशांकाचा अभ्यास करून काही निरीक्षणे प्रसिद्ध केली आहेत. त्यात अतिअसुरक्षित म्हणजे जिथे संसर्ग वेगाने पसरू शकतो, त्याशिवाय दीर्घकाळ लक्षणे न दिसण्याची शक्यताही असते, असे त्यात म्हटले आहे. बहुतांश भारतीयांना आता व्यक्तिगत पातळीवरील धोके लक्षात आले आहेत. मात्र, हवामान बदल, सामाजिक घटकांचा संभाव्य परिणाम आदींबाबत फारशी माहिती नसल्याचे समोर आल्याचे संस्थेने अहवालात म्हटले आहे. साथीचा परिणाम कमी करण्याच्या हेतूने हे संशोधन केल्याचे संस्थेच्या भागीदार डॉ. अॅंजेला चौधरी यांनी म्हटले आहे.
देशव्यापी लॉकडाउनच्या ५०व्या दिवसात बुधवारी देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या पाऊण लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी जवळजवळ एकतृतीयांश रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात करोनाग्रस्तांच्या चाचण्यांची संख्याही आता दिवसाला एक लाखाच्या आकड्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. गेल्या २४ तासांत ९४ हजार ६७१ संशयित करोनाग्रस्तांच्या चाचण्यांची नोंद करण्यात आली.
देशभरात आजवरच्या करोनाग्रस्तांची संख्या ७४ हजार २८१ झाली आहे. त्यापैकी २४ हजार ३८६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ३२.८२ आहे. २४ तासात १,९३२ रुग्ण बरे झाले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ४८० इतकी असून गेल्या २४ तासात करोनाच्या ३५२५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत १२२ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा २४१५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ३५६ सरकारी आणि १४६ खासगी प्रयोगशाळांमध्ये १८ लाख ५४ हजार २५० करोनाग्रस्तांच्या चाचण्या झाल्या आहेत.
६४२.७ लाख टन गहू-तांदळाचा साठा
देशव्यापी लॉकडाउनला ५० दिवस पूर्ण होत आले असताना भारतीय अन्न महामंडळाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत विविध योजनांखाली १५९.३६ लाख टन अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. राज्यांनी करोना संकटाच्या काळात ६०.८७ लाख टन धान्याची उचल केली. पंतप्रधान ग्रामीण कल्याण योजनेंतर्गत ७९.७४ लाख टन धान्याची उचल करण्यात आली आहे. १ मे २०२० रोजी देशात ६४२.७ लाख टन गहू आणि तांदळाचा साठा होता. त्यात २८५.०३ लाख टन तांदूळ, तर ३५७.७ लाख टन गव्हाचा समावेश आहे.
बहुतांश जिल्हे असुरक्षित
नवी दिल्ली : बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातमधील बहुतांश जिल्हे करोना संकटात असुरक्षित असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. केवळ इतकेच नव्हे; तर या राज्यांच्या शेजारी असलेल्या राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्हेही वेगवान संसर्गामध्ये आघाडीवर राहतील, अशा इशाराही संबंधित संस्थेने दिला आहे. 'स्वस्ती' या संस्थेने विविध आकडेवारी व जागतिक निर्देशांकाचा अभ्यास करून काही निरीक्षणे प्रसिद्ध केली आहेत. त्यात अतिअसुरक्षित म्हणजे जिथे संसर्ग वेगाने पसरू शकतो, त्याशिवाय दीर्घकाळ लक्षणे न दिसण्याची शक्यताही असते, असे त्यात म्हटले आहे. बहुतांश भारतीयांना आता व्यक्तिगत पातळीवरील धोके लक्षात आले आहेत. मात्र, हवामान बदल, सामाजिक घटकांचा संभाव्य परिणाम आदींबाबत फारशी माहिती नसल्याचे समोर आल्याचे संस्थेने अहवालात म्हटले आहे. साथीचा परिणाम कमी करण्याच्या हेतूने हे संशोधन केल्याचे संस्थेच्या भागीदार डॉ. अॅंजेला चौधरी यांनी म्हटले आहे.