अ‍ॅपशहर

३३ टक्के हिंदूंना वाटतात मुस्लिम खरे मित्र!

आपण मित्र कोणाला बनवतो यात धर्माची भूमिका महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या धर्माचे लोक मैत्री करताना धार्मिकतेचा विचार करतात, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने अलिकडेच एक सर्वे केला. या सर्वेतून ही बाब समोर आली आहे.

Maharashtra Times 5 Apr 2017, 12:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम only 33 of hindus count a muslim as a close friend survey
३३ टक्के हिंदूंना वाटतात मुस्लिम खरे मित्र!


आपण मित्र कोणाला बनवतो यात धर्माची भूमिका महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या धर्माचे लोक मैत्री करताना धार्मिकतेचा विचार करतात, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने अलिकडेच एक सर्वे केला. या सर्वेतून ही बाब समोर आली आहे.

९१ टक्के हिंदुंचे चांगले मित्र हे आपल्याच समाजातील असतात. ३३ टक्के हिंदुंनी आपले जवळचे मित्र मुस्लिम समुदायातील असल्याचंही म्हटलं आहे. तर ७४ टक्के मुस्लिमांचे हिंदुंशी अतिशय जवळचे संबंध आहेत. हिंदू आणि मुस्लिमांनी जवळचे मित्र हे आपल्याच समाजातील बनवले आहेत, असं CSDS च्या सर्वेत निदर्शनास आलं आहे. याशिवाय गुजरात, हरयाणा, कर्नाटक आणि ओडिशातील मुस्लिम समाज हा वेगळं रहाणं पसंत करतो, असंही सर्वेत म्हटलं आहे.

सर्वेत सहभागी झालेल्या १३ टक्के हिंदुंच्या मते मुस्लिम समजातील लोक हे देशभक्त असतात. २० टक्के हिंदुंना ख्रिश्चन देशभक्त वाटतात. ४७ टक्के हिंदू हे शिख धर्माच्या लोकांना अधिक देशभक्त मानतात. स्वतः मुस्लिम समाजाच्या मते ७७ टक्के मुस्लिम हे जास्त देशभक्त आहेत. २६ टक्के ख्रिश्चनांच्या मते मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना अधिक आहे. तर ६६ टक्के शिखांच्या मते हिंदुंमध्ये प्रचंड देशभक्ती असते.

सर्वेत सहभागी झालेल्यांच्या मते तीन चतुर्थांश मुस्लिमांचे जवळचे मित्र हे हिंदू आहेत. तर हिंदूचे एक तृतियांश मित्र मुस्लिम आहेत. ख्रिश्चन समाजातील नागरिकांना इतर धर्मियांशी मैत्री करण्यात फारसा रस नाही. पण तुलना केल्यास मुस्लिमांपेक्षा त्यांचे हिंदुंशी चांगले संबंध आहेत.

गायीचा सम्मान, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भारत माता की जयची घोषणा देणं, बीफ खाणं आणि राष्ट्रगीतावेळी उभं रहाणं अशा मुद्द्यांवरील प्रश्नांवर विविध धर्माच्या नागरिकांनी आपली मतं माडंली. ७२ टक्के नागरिक या मुद्द्यांच्या बाजूने उभे राहिले. तर १७ टक्के लोकांनी दबक्या आवाजात खुले विचार मांडले. ६ टक्के नागरिकांनी तर यावर स्वतंत्र भूमिका मांडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज