वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर करण्यात आलेल्या छळाच्या आरोप प्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. चिन्मयानंद यांनी छळ केल्याचा आरोप शहाजहानपूर येथील विधीविषयाच्या विद्यार्थिनीने केला होता. नंतर ती बेपत्ता झाली होती. गेल्या आठवड्यात ती सापडल्यानंतर तिला सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान चिन्मयानंद यांच्या वकिलाने संबंधित तरुणीचे आरोप फेटाळले असून, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा दावा केला आहे.
चिन्मयानंद प्रकरणी 'एसआयटी' स्थापण्याचे आदेश
भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर करण्यात आलेल्या छळाच्या आरोप प्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
महाराष्ट्र टाइम्स 3 Sep 2019, 4:00 am