अ‍ॅपशहर

महाविकास आघाडीचे सरकार १५ वर्षे टिकेल: पाटील

सरकार स्थापनेला विलंब का होत आहे, याची महाराष्ट्रात चर्चा आहे. मात्र हे सरकार अधिक काळ भक्कमपणे टिकावं यासाठीच या चर्चा सुरू असून भक्कम पायावर उभं राहिलेलं सरकार पाच वर्षेच काय पुढची १५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आज व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 5:08 am

शरद पवार-उद्धव यांच्यात खलबतं; १ तास चालली बैठक

नवी दिल्ली: सरकार स्थापनेला विलंब का होत आहे, याची महाराष्ट्रात चर्चा आहे. मात्र हे सरकार अधिक काळ भक्कमपणे टिकावं यासाठीच या चर्चा सुरू असून भक्कम पायावर उभं राहिलेलं सरकार पाच वर्षेच काय पुढची १५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आज व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayant-patil


महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्या. दिल्लीत दोन दिवस चाललेलं हे बैठकसत्र अखेर आज संपलं. या प्रदीर्घ चर्चेच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी या चर्चेची आवश्यकता अधोरेखित केली. राज्याला स्थिर सरकार मिळावं हा प्रामाणिक उद्देश या सर्वामागे आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येत असताना या तिन्ही पक्षांत समन्वय महत्त्वाचा असेल. आम्हाला आघाडीचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा पक्ष आमच्यासोबत जोडला जात आहे. त्यांना सोबत घेऊन आता आम्हाला समन्वय साधावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष मिळून समन्वय समिती बनवून पुढे जाऊ, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.

आधी सेनेशी चर्चा; नंतर राज्यपाल भेट: चव्हाण

मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता आताच त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. दिल्लीतील चर्चा संपल्यानंतर आता प्रथम निवडणूकपूर्व आघाडीतील अन्य घटक पक्षांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. या संयुक्त बैठकीनंतर महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही जाहीरपणे आमची भूमिका मांडणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज