नवी दिल्ली भारतीय कुबेरांच्या संपत्तीत गेल्या वर्षात दररोज तब्बल २,२०० कोटी रुपयांची भर पडली आहे. गेल्या वर्षात १ टक्का असलेले हे कुबेर आता ३९ टक्क्यांनी अधिक श्रीमंत झाले आहेत. तर अर्थिकरित्या कमकुवत असलेल्यांच्या संपत्तीत फक्त तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. 'ऑक्सफेम' या संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
जागतिक आर्थिक परिषदेच्या पाच दिवस आधी 'ऑक्सफेम'चा हा अहवाल आला आहे. २०१८मध्ये जागतिक पातळीवरील कुबेरांच्या संपत्तीत दररोज १२ टक्के म्हणजे २.५ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. तर जगातील सर्वाधिक गरीब आणखी गरीब झालेत. त्यांच्या संपत्तीत ११ टक्क्यांची घट झाली आहे.
१३.६ कोटी भारतीय २००४पासून कर्जात बुडाले आहेत. या १३.६ कोटी भारतीयांमध्ये १० टक्के लोक हे देशातील सर्वात गरीबांमध्ये मोडले जातात. धनाढ्य आणि गरीबांमधील ही वाढती दरी गरीबीविरोधातील लढाई, अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी आहे. यामुळे जगभरात लोकांच्या भावना अधिक उग्र होऊ शकतात, असं 'ऑक्सफेम'ने अहवालात म्हटलं आहे.
मूठभर धनाढ्यांचा भारताच्या संपत्तीतील वाटा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे गरीबांना दोन वेळचं जेवण आणि औषध, उपचारांसाठी संघर्ष करावा लागतोय. नैतिक दृष्टीकोनातून हे अतिशय अपमानकारक आहे, असं ऑक्सफेम इंटरनॅशनल संस्थेच्या कार्यकारी संचालक विनी ब्यानमिया यांनी सांगितलं. धनाढ्य फक्त १ टक्का आणि दुसऱ्या बाजुला उर्वरीत भारत ही विषमता देशाची सामाजिक रचना आणि लोकशाहीचा पाया ठिसूळ करणारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
पाहा व्हिडिओ:
फक्त २६ लोकांकडे एवढी संपत्ती आहे जेवढी जगातील ३.८ टक्के लोकांकडे आहे. हे लोक जगातील निम्म्याहून अधिक गरीब जनतेचे प्रतिनिधत्व करतात. भारतातील १० टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा ७७.४ टक्के इतका वाटा आहे. तर देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५१.५३ टक्के इतका मोठा वाटा फक्त एक टक्का लोकांकडे आहे, अशी माहिती 'ऑक्सफेम'ने दिली.
जागतिक आर्थिक परिषदेच्या पाच दिवस आधी 'ऑक्सफेम'चा हा अहवाल आला आहे. २०१८मध्ये जागतिक पातळीवरील कुबेरांच्या संपत्तीत दररोज १२ टक्के म्हणजे २.५ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. तर जगातील सर्वाधिक गरीब आणखी गरीब झालेत. त्यांच्या संपत्तीत ११ टक्क्यांची घट झाली आहे.
१३.६ कोटी भारतीय २००४पासून कर्जात बुडाले आहेत. या १३.६ कोटी भारतीयांमध्ये १० टक्के लोक हे देशातील सर्वात गरीबांमध्ये मोडले जातात. धनाढ्य आणि गरीबांमधील ही वाढती दरी गरीबीविरोधातील लढाई, अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी आहे. यामुळे जगभरात लोकांच्या भावना अधिक उग्र होऊ शकतात, असं 'ऑक्सफेम'ने अहवालात म्हटलं आहे.
मूठभर धनाढ्यांचा भारताच्या संपत्तीतील वाटा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे गरीबांना दोन वेळचं जेवण आणि औषध, उपचारांसाठी संघर्ष करावा लागतोय. नैतिक दृष्टीकोनातून हे अतिशय अपमानकारक आहे, असं ऑक्सफेम इंटरनॅशनल संस्थेच्या कार्यकारी संचालक विनी ब्यानमिया यांनी सांगितलं. धनाढ्य फक्त १ टक्का आणि दुसऱ्या बाजुला उर्वरीत भारत ही विषमता देशाची सामाजिक रचना आणि लोकशाहीचा पाया ठिसूळ करणारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
पाहा व्हिडिओ:
फक्त २६ लोकांकडे एवढी संपत्ती आहे जेवढी जगातील ३.८ टक्के लोकांकडे आहे. हे लोक जगातील निम्म्याहून अधिक गरीब जनतेचे प्रतिनिधत्व करतात. भारतातील १० टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा ७७.४ टक्के इतका वाटा आहे. तर देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५१.५३ टक्के इतका मोठा वाटा फक्त एक टक्का लोकांकडे आहे, अशी माहिती 'ऑक्सफेम'ने दिली.