अ‍ॅपशहर

padma awards : पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. सामाजिक, उद्योग, कला आणि साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्यांचा या पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो. यंदा महाराष्ट्रातील ६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2021, 12:34 am
नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची ( padma awards 2021 ) घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ ( sindhutai sapkal ) आणि गिरीश प्रभुणे ( girish prabhune ) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे ( parshuram gangavane ) आणि उद्योग श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhutai sapkal
पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर


सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल, नामदेव कांबळे ( namdeo kamble ) यांना साहित्यातील योगदानाबद्दल आणि जसवंतीबेन पोपट यांना ( jaswantiben popat ) उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचा ( rajnikant shroff ) पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

यासोबतच कला क्षेत्रात एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर ), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्म विभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन; चीनला दिला इशारा

शेतकरी संघटना आक्रमक; ट्रॅक्टर परेडनंतर आता १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये १० जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. या महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. सरकारने ७ जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात पार्श्वगायक एस. पी बालसब्रमण्यम यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. तर १०२ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.


माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, माजी केंद्रीयमंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर) आणि धर्मगुरु कलदी सादिक (मरणोत्तर) यांच्यासह १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज