अ‍ॅपशहर

पाकनं भारताचे आभारच मानले पाहिजेत: अदनान

जन्मानं पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामीनं आता पाकिस्तानवरच शाब्दिक हल्ला चढवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'बद्दल पाकिस्ताननं भारताचे आभारच मानायला हवेत, असं त्यानं दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हटलं.

Maharashtra Times 4 Oct 2016, 4:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pak should thanks to india says singer adnan sami
पाकनं भारताचे आभारच मानले पाहिजेत: अदनान


जन्मानं पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामीनं आता पाकिस्तानवरच शाब्दिक हल्ला चढवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'बद्दल पाकिस्ताननं भारताचे आभारच मानायला हवेत, असं त्यानं दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

दोन्ही देशांसह संपूर्ण जगालाही जबर जखमा देणाऱ्या शत्रूंविरोधात माझं 'ते' ट्विट होतं. त्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम भारतानं केलं आहे. त्याबद्दल पाकिस्ताननं भारताचे आभारच मानले पाहिजेत, असं अदनाननं म्हटलं. दिल्लीत एका पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी तो बोलत होता. दोन्हीही देश दहशतवादाचे बळी ठरलो आहोत, असं पाकिस्तान अनेक वर्षांपासून म्हणत आहे. पण शेजारी देश दहशतवादापासून सुटका करण्यासाठी तुमची मदत करू इच्छितो. तुमच्याकडून मात्र त्याची साधी दखल घेतली जात नाही, असा प्रश्नही त्यानं उपस्थित केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज