अ‍ॅपशहर

भारताचा दणका, पाकच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना पाठिंबा. सीमेवर शस्रसंधींचे उल्लंघन करत सतत गोळीबार आणि तर दिल्लीतील उच्चायुक्तालयाचे अधिकारी हेरगिरी करण्यात सामील. यामुळे भारताने पाकिस्तानला आज दणका दिला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील निम्मे कर्मचारी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 8:43 pm
नवी दिल्लीः भारत सरकारने (Ministry of External Affairs) नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या (pakistan high commission new delhi ) उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानकडून राजनैतिक पातळीवर व्हिएन्न कराराचे सतत उल्लंघन होत आहे. यामुळे हा निर्णय घेतल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासह इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील ५० टक्के कर्मचारी भारत कमी करणार आहे. पुढच्या सात दिवसांत हा निर्णय लागू होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्तालय (File Photo)


पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील उच्चायुक्तांना बोलावून भारताने ही माहिती दिलीय. भारताने वेळोवेळी कळवूनही पाकिस्तान राजनैतिक संबंधांच्या मापदंडांवर खरा उतरलेला नाही. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी हेरगिरीसह आणि दहशतवादी संघटनांच्या भेटी घेत आहेत. अलिकडेच दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगे हात पकडण्यात आलं आहे.

चीनी सैनिकांना धडा शिकवणाऱ्या शूर जवानांना लष्कर प्रमुख भेटले

मायलेकांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपचा हल्लाबोल

दुसरीकडे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा पाकिस्तानकडून छळ केला जातोय. काही दिवसांपूर्वी भारताच्या दोन कर्मचाऱ्यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले. तसंच त्यांना मारहाण केली गेली. एवढचं नव्हे तर खोट्या प्रकरणांमध्ये त्यांना गोवण्यात आलं होतं. हे दोन्ही कर्मचारी २२ जूनला मायदेशात दाखल झाले. आज त्यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. कशा प्रकारे त्यांचे हाल केले गेले, याची माहिती त्यांनी दिली. व्हिएन्ना आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधाबाबत झालेल्या करारांचे उल्लंघन केल्याने पाकिस्तान याला दोषी आहे. भारताच्या या निर्णयामुळे आता दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५-५५ इतकी असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज