अ‍ॅपशहर

पाकिस्तानकडून 'ईद मुबारक'; हवाई क्षेत्र भारतासाठी खुले

पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांच्या प्रवेशावर घातलेली बंदी उठवली आहे. सोमवारी रात्री इंडिगोचे दुबई-दिल्ली विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून भारतात दाखल झाले. पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी अहमदाबादजवळील टेलेम एन्ट्री पॉईंट सुरू केला होता.

Saurabh Sinha | टाइम्स न्यूज नेटवर्क 5 Jun 2019, 11:07 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indigo


पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांच्या प्रवेशावर घातलेली बंदी उठवली आहे. सोमवारी रात्री इंडिगोचे दुबई-दिल्ली विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून भारतात दाखल झाले. पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी अहमदाबादजवळील टेलेम एन्ट्री पॉईंट सुरू केला होता.

इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला रात्री उशिरा फोन आला होता. त्यावेळी, 'आपण आतापर्यंत जागे आहात का, मी विमानाचे मॉनिटरिंग करत असून विमान लँड झाले आहे. आम्ही आपल्याला शब्द दिला होता. ईद मुबारक.'' असा संवाद साधत पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाच्या संचालकांनी ही माहिती दिली असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई केले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारीपासून भारतीय विमानांचे पाकिस्तानमधील ११ एन्ट्री पॉईंट्सना बंद करण्यात आले होते. या बंदीमुळे दिल्लीसह दक्षिण आशिया व पाश्चिमात्य देशांच्या विमानांना इतर लांबच्या मार्गांचा वापर करावा लागत होता.

पहिला लँड पॉईंट रविवारी टेलेममध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर काही वेळेनंतर एतिहादचे अबूधाबी-दिल्ली विमान पाकिस्तान मार्गे भारतात आले. त्यानंतर इंडिगो या भारतीय विमानाने पाकिस्तान मार्गे दिल्लीत लँडिंग केले. पाकिस्तानने केलेल्या सूचनेनुसार, टेलेम एन्ट्री पॉईंटचा वापर करण्याआधी एका विमानाची चाचणी उड्डाण करण्यात यावे. त्यानुसार, दुबई-दिल्ली विमान या पॉईंट मार्गे भारतात दाखल झाले.
लेखकाबद्दल
Saurabh Sinha

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज