अ‍ॅपशहर

काश्मीर सीमेवर धुमश्चक्री; पाकची चौकी उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने बिथरलेल्या पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून भारताकडूनही त्यास चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारतीय लष्कराने आज राजौरी सेक्टरजवळ सीमेपलीकडील पाकिस्तानची सुरक्षा चौकी उद्ध्वस्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2019, 5:22 pm
श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने बिथरलेल्या पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून भारताकडूनही त्यास चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारतीय लष्कराने आज राजौरी सेक्टरजवळ सीमेपलीकडील पाकिस्तानची सुरक्षा चौकी उद्ध्वस्त केली. दरम्यान, पाककडून सकाळी साडेसहाच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाक सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम loc-firing


जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. काश्मीर अस्थिर करण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. काही पाकपुरस्कृत दहशतवादी गटही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे काश्मीरमधील सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री केरन सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी घुसखोरीचा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकच्या गोळाबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकच्या चार जवानांना कंठस्नान घातलं.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात लान्स नायक संदीप थापा (३५) हे शहीद झाले. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. सीमेपलीकडील पाकची एक सुरक्षा चौकी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या भागात सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. गोळीबार अद्याप थांबलेला नाही, असे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज