वृत्तसंस्था, नवी दिल्ली वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत वालिद अबू अली यांना पॅलेस्टाइन सरकारने माघारी बोलावले आहे. जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा
सूत्रधार हाफिझ सईदच्या रावळपिंडीतील कार्यक्रमात ते उपस्थित होते.
या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केल्यानंतर पॅलेस्टाइन सरकारने या कृत्याबद्दल भारताची जाहीर माफी मागितली असून, त्वरित कारवाई केली आहे, अशी माहिती पॅलेस्टाइनचे भारतातील दूत अदनान अबू अल हैजा यांनी दिली.
पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत वालिद अबू अली यांना पॅलेस्टाइन सरकारने माघारी बोलावले आहे. जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदच्या रावळपिंडीतील कार्यक्रमात ते उपस्थित होते. या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केल्यानंतर पॅलेस्टाइन सरकारने या कृत्याबद्दल भारताची जाहीर माफी मागितली असून, त्वरित कारवाई केली आहे, अशी माहिती पॅलेस्टाइनचे भारतातील दूत अदनान अबू अल हैजा यांनी शनिवारी दिली. हैजा म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच पॅलेस्टाइन सरकारने आमच्या दूताला थेट परत बोलवून घेतले. अली आता पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत नाहीत.’ संयुक्त राष्ट्रांनी हाफिझ सईद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केले असतानाही अली रॅलीमध्ये त्याच्यासोबत व्यासपीठावर दिसल्याचे फोटो सोशल साइटच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.
पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत वालिद अबू अली यांना पॅलेस्टाइन सरकारने माघारी बोलावले आहे. जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा
सूत्रधार हाफिझ सईदच्या रावळपिंडीतील कार्यक्रमात ते उपस्थित होते.
या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केल्यानंतर पॅलेस्टाइन सरकारने या कृत्याबद्दल भारताची जाहीर माफी मागितली असून, त्वरित कारवाई केली आहे, अशी माहिती पॅलेस्टाइनचे भारतातील दूत अदनान अबू अल हैजा यांनी दिली.
पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत वालिद अबू अली यांना पॅलेस्टाइन सरकारने माघारी बोलावले आहे. जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदच्या रावळपिंडीतील कार्यक्रमात ते उपस्थित होते. या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केल्यानंतर पॅलेस्टाइन सरकारने या कृत्याबद्दल भारताची जाहीर माफी मागितली असून, त्वरित कारवाई केली आहे, अशी माहिती पॅलेस्टाइनचे भारतातील दूत अदनान अबू अल हैजा यांनी शनिवारी दिली. हैजा म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच पॅलेस्टाइन सरकारने आमच्या दूताला थेट परत बोलवून घेतले. अली आता पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील दूत नाहीत.’ संयुक्त राष्ट्रांनी हाफिझ सईद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केले असतानाही अली रॅलीमध्ये त्याच्यासोबत व्यासपीठावर दिसल्याचे फोटो सोशल साइटच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.