नवी दिल्ली :
'आम्ही केंद्रात सत्तेत आलो तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजविण्यात गेला,' अशी टीका करतानाच देशातील तरूण भजी विकून कुटुंब चालवत असेल तर त्यात गैर काय? त्यांची भिकाऱ्यांशी तुलना करून थट्टा करणं कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अमित शहा यांनी केला.
अमित शहा यांचं राज्यसभेतील खासदार म्हणून हे पहिलं भाषण होतं. पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाचा मुक्तकंठाने गौरव केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. 'आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा खूप काम करावं लागलं. मागच्या सरकारने निर्माण केलेले खड्डे बुजविण्यात आमचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे आमचं विश्लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केलं पाहिजे,' असं शहा यांनी सांगितलं. '२०१३ मध्ये देशाची जी स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचं संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते,' अशी टीका शहा यांनी केली.
'३० वर्षात सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. तरीही आम्ही रालोआचं सरकार स्थापन केलं. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचं सरकार असेल, हे सरकार गांधी आणि दीनदयाल यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असं म्हटलं होतं,' असंही शहा म्हणाले.
यावेळी शहा यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. 'जनधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जे ६० वर्षात झालं नाही, ते आता कसं होईल, या विचारानं मीही सांशक होतो. पण आज ३१ कोटी लोकांचं बँकेत खातं आहे,' असंही त्यांनी सांगितलं.
तर भजी विकणं चांगलं
'बेरोजगार राहण्यापेक्षा तरुणांनी भजी विकणं कधीही चांगलं. भजी विकणं लज्जास्पद काम नाही. त्याची भिकाऱ्यांशी तुलना करू नका,' असा टोला शहा यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना लगावला. भजी विकून एखादा तरूण जर मुलांचं शिक्षण करत असेल तर बिघडलं कुठं?, उद्या भजी विकणाऱ्यांचा मुलगाही पुढे काही तरी होईल, असं सांगतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं उदाहरण दिलं. चाय विकणारे मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. यापूर्वी हिवाळी अधिवेशनात जीएसटीवर होणाऱ्या चर्चेत शहा यांचं भाषण होणार होतं. पण विरोधकांच्या गोंधळामुळे हे भाषण होऊ शकलं नव्हतं.
'आम्ही केंद्रात सत्तेत आलो तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजविण्यात गेला,' अशी टीका करतानाच देशातील तरूण भजी विकून कुटुंब चालवत असेल तर त्यात गैर काय? त्यांची भिकाऱ्यांशी तुलना करून थट्टा करणं कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अमित शहा यांनी केला.
अमित शहा यांचं राज्यसभेतील खासदार म्हणून हे पहिलं भाषण होतं. पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाचा मुक्तकंठाने गौरव केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. 'आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा खूप काम करावं लागलं. मागच्या सरकारने निर्माण केलेले खड्डे बुजविण्यात आमचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे आमचं विश्लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केलं पाहिजे,' असं शहा यांनी सांगितलं. '२०१३ मध्ये देशाची जी स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचं संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते,' अशी टीका शहा यांनी केली.
'३० वर्षात सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. तरीही आम्ही रालोआचं सरकार स्थापन केलं. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचं सरकार असेल, हे सरकार गांधी आणि दीनदयाल यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असं म्हटलं होतं,' असंही शहा म्हणाले.
यावेळी शहा यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. 'जनधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जे ६० वर्षात झालं नाही, ते आता कसं होईल, या विचारानं मीही सांशक होतो. पण आज ३१ कोटी लोकांचं बँकेत खातं आहे,' असंही त्यांनी सांगितलं.
तर भजी विकणं चांगलं
'बेरोजगार राहण्यापेक्षा तरुणांनी भजी विकणं कधीही चांगलं. भजी विकणं लज्जास्पद काम नाही. त्याची भिकाऱ्यांशी तुलना करू नका,' असा टोला शहा यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना लगावला. भजी विकून एखादा तरूण जर मुलांचं शिक्षण करत असेल तर बिघडलं कुठं?, उद्या भजी विकणाऱ्यांचा मुलगाही पुढे काही तरी होईल, असं सांगतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं उदाहरण दिलं. चाय विकणारे मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. यापूर्वी हिवाळी अधिवेशनात जीएसटीवर होणाऱ्या चर्चेत शहा यांचं भाषण होणार होतं. पण विरोधकांच्या गोंधळामुळे हे भाषण होऊ शकलं नव्हतं.