नवी दिल्ली : आज दिल्लीत काँग्रेससहीत १४ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी चर्चा केली. वादग्रस्त कृषी कायदे, पेगॅसस हेरिगिरी यांसहीत इतर मुद्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकत्रितरित्या सरकारला घेरण्यासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात आला. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील कक्षात ही बैठक पार पडली. या बैठकीत खरगे यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासहीत इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीशिवाय डीएमके, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे या पक्षांचा यात समावेश होता. दोन्ही सदनांत विरोधकांचा आवाज उंचावण्यासाठी रुपरेषा या बैठकीत तयार करण्यात आली.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, 'राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला चर्चा करण्याची इच्छा नसेल तर आणखी कोणत्या मुद्यावर करणार?' असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. कृषी कायदे आणि पॅगेसस हेरगिरी प्रकरणावर विरोधी पक्ष एकत्र आहेत आणि राहतील, असंही त्यांनी म्हटलंय.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
विरोधी नेते सोडाच परंतु, स्वत:च्याच मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांनीही त्यांनी सोडलं नाही... त्यांच्यावरही पाळत ठेवली गेली, हे अतिशय धक्कादायक आहे. या प्रश्नावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी आहे. परंतु, सरकारनं मात्र चर्चेची कोणतीही तयारी दाखवलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
संसदेचं कामकाज आजही स्थगित
दरम्यान, आज संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कृषी कायदे आणि पेगॅसस मुद्यावर जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ कागदपत्रंही भिरकावण्यात आली. यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
लोकसभेचं कामकाज ११.०० वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा १२.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर, पुन्हा हे कामकाज २.०० वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेचंही कामकाज पहिल्यांदा १२.०० वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी २.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आणि कामकाजाचा सातवा दिवस आहे.
Basavaraj Bommai: कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं महाराष्ट्र कनेक्शन
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, 'राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला चर्चा करण्याची इच्छा नसेल तर आणखी कोणत्या मुद्यावर करणार?' असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. कृषी कायदे आणि पॅगेसस हेरगिरी प्रकरणावर विरोधी पक्ष एकत्र आहेत आणि राहतील, असंही त्यांनी म्हटलंय.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
विरोधी नेते सोडाच परंतु, स्वत:च्याच मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांनीही त्यांनी सोडलं नाही... त्यांच्यावरही पाळत ठेवली गेली, हे अतिशय धक्कादायक आहे. या प्रश्नावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी आहे. परंतु, सरकारनं मात्र चर्चेची कोणतीही तयारी दाखवलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
संसदेचं कामकाज आजही स्थगित
दरम्यान, आज संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कृषी कायदे आणि पेगॅसस मुद्यावर जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ कागदपत्रंही भिरकावण्यात आली. यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
लोकसभेचं कामकाज ११.०० वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा १२.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर, पुन्हा हे कामकाज २.०० वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेचंही कामकाज पहिल्यांदा १२.०० वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी २.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आणि कामकाजाचा सातवा दिवस आहे.
Basavaraj Bommai: कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं महाराष्ट्र कनेक्शन