हरिद्वार:
'अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रश्न कोर्टातून नव्हे तर संसदेतूनच सुटेल. त्यासाठी संसदेवर दबाव टाकला जात आहे', असं सांगतानाच 'कोर्ट आणि संसदेनं राम मंदिर उभारलं नाही तर देशात बंडाळी माजू शकते', असा इशारा योग गुरु बाबा रामदेव यांनी दिला आहे.
हरिद्वारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता आले असता रामदेव बाबा यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बालकृष्णही उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंदिराचा प्रश्न संसदेतूनच मार्गी लागेल, असं स्पष्ट सांगितलं.
या आधीही रामदेव बाबांनी राम मंदिराची उभारणी न झाल्यास देशातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, असा इशारा दिला होता. आता नाही तर कधी नाही, या विचारातून राम मंदिराच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले होते. राम मंदिराचा प्रश्न तडजोडीने सुटण्याची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे संसदेत कायदा बनवून मंदिराचा प्रश्न सोडवण्यात आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी हा इशारा दिला आहे.
'अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रश्न कोर्टातून नव्हे तर संसदेतूनच सुटेल. त्यासाठी संसदेवर दबाव टाकला जात आहे', असं सांगतानाच 'कोर्ट आणि संसदेनं राम मंदिर उभारलं नाही तर देशात बंडाळी माजू शकते', असा इशारा योग गुरु बाबा रामदेव यांनी दिला आहे.
हरिद्वारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता आले असता रामदेव बाबा यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बालकृष्णही उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंदिराचा प्रश्न संसदेतूनच मार्गी लागेल, असं स्पष्ट सांगितलं.
या आधीही रामदेव बाबांनी राम मंदिराची उभारणी न झाल्यास देशातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, असा इशारा दिला होता. आता नाही तर कधी नाही, या विचारातून राम मंदिराच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले होते. राम मंदिराचा प्रश्न तडजोडीने सुटण्याची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे संसदेत कायदा बनवून मंदिराचा प्रश्न सोडवण्यात आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी हा इशारा दिला आहे.