अ‍ॅपशहर

करोना संकटात खासगी हॉस्पिटल्सकडून लूट, संसदीय समितीचा अहवाल

करोनाचं संकट अद्यापही कायम आहे. करोनाचे रुग्ण लवकर बरे होत असले तरी ऐन संकटाच्या काळात खासगी हॉस्पिटल्सनी रुग्णांची लूट केली, असा अहवाल संसदीय समितीने दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2020, 1:47 am
नवी दिल्ली: संपर्ण देश करोना संकटाचा सामना ( coronavirus india ) करत आहे. पण करोनाशी लढताना सरकारी आरोग्य सेवांचा अभाव आहे. तसेच खासगी रुग्णालयांबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. यामुळे, करोनाग्रस्त रूग्णांना संकटाच्या काळात उपचारासाठी जास्त पैसा खर्च करावा लागला. खासगी रुग्णालयांनी रूग्णाच्या उपचारासाठी जास्त पैसे आकारले. संसदीय समितीने ( covid 19 committee ) शनिवारी आपल्या अहवालात ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid-19 report
करोना संकटात खासगी हॉस्पिटल्सकडून लूट, संसदीय समितीचा अहवाल


करोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता होती. तसेच या संकटाच्या आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट मार्गदर्शक सूचनांचा अभाव होता. यामुळे खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून पैसे घेतले. खासगी रूग्णालयांवर कोरोनावर उपचार करण्यासाठी काही निश्चित दर लावण्यात आले असते तर बरेच मृत्यू टाळता आले असते, असं संसदीय समितीने म्हटले आहे.

सरकारचा आरोग्यवर कमी खर्च

आरोग्य विषयक स्थायी संसदीय समितीचे अध्यक्ष राम गोपाल यादव यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना 'करोना व्हायरचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन' या विषयावरील अहवाल सादर केला. करोना संकटावरील सादर झालेला हा अहवाल इतर कुठल्या एका संसदीय समितीने सादर केलेला पहिलाच अहवाल आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सरकारकडून आरोग्यावर होणारा खर्च 'अत्यंत कमी' आहे आणि साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणेच्या नाजूक स्थितीने एक मोठी अडचण आली आहे, असं समितीने म्हटलंय.

coronavirus- करोना: दिवसाला आढळले 'एवढे' रुग्ण, 'या' ५ शहरांमध्ये नाइट कर्फ्यू

करोना लस तीन ते चार महिन्यांत : डॉ. हर्षवर्धन

सार्वजनिक आरोग्यात गुंतवणुकीची गरज

सार्वजनिक आरोग्य सेवेत गुंतवणूक वाढवण्याची शिफारस संसदीय समितीने या अहवालातून सरकारला केली आहे. आगामी दोन वर्षांच्या आत जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंतच्या खर्च राष्ट्रीय आरोग्य धोरणांचे उद्दीष्ट निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. कारण २०२५ चा नियोजित कालावधी अजून खूप दूर आहे आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात टाकता येणार नाही, असं संसदीय समितीने अहवालात नमुद केलंय. करोना संटकात ज्या डॉक्टरांनी जीव गमावला त्यांना शहीद घोषित करावं. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसा मोबदला देण्यात यावा, अशी शिफारसही समितीने केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज