कोलकाता: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 'सबका प्रयास, सबका विकास' हा संकल्प त्यांनी सोडला. मोदी सरकार विकासाच्या ५जी स्पीड स्वार झाल्याचा डंकाही या माध्यमातून करण्यात आला. मात्र, विरोधी पक्षाने निर्मला सीतारामन यांना फेल ठरवले असून अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आली आहे. ( Mamata Banerjee Latest News ) वाचा : करोना संकटाचा उल्लेख करत निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान
ममता बॅनर्जी यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. बेरोजगारी आणि महागाई अशा दुहेरी संकटाच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य जनतेसाठी हे बजेट झीरो आहे, अशा शब्दांत ममता यांनी हल्ला चढवला. सरकारने मोठमोठ्या वल्गना केल्यात पण प्रत्यक्षात सामान्यांना या बजेटमधून काहीच मिळालेले नाही, असे नमूद करतानाच हा तर कल्पनाविलास, भूलभुलैया आणि शब्दांचा खेळ असल्याचा टोला ममता यांनी हाणला.
वाचा : पीएम गती शक्ती; पायाभूत क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारी महत्वाकांक्षी योजना
माकप नेते सीताराम येचुरी यांनीही बेजटवर टीका केली. देशात बेरोजगारी, गरिबी, भूकबळी वाढत असताना याच संकटकाळात नफेखोरी करणाऱ्या धनिकांवर अधिक कर का लावला गेला नाही, असा सवाल येचुरी यांनी केला. देशातील आर्थिक विषमतेवरही त्यांनी बोट ठेवले. सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांकडे देशाची ७५ टक्के संपत्ती एकवटली आहे तर तळाच्या ६० टक्के लोकांकडे एकूण संपत्तीतला ५ टक्के भागही नाही. ही गंभीर स्थिती असताना तुमचे बजेट नेमके कुणासाठी आहे?, असा सवालही येचुरी यांनी केला. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही बजेटवर नाराजी व्यक्त केली. 'यंदाच्या बजेटमध्ये काहीच नाही, अशी माझी पहिली प्रतिक्रिया असेल. या बजेटने सर्वांची निराशा केली आहे. देशातील जनता महागाईचे चटके सोसत असताना त्यांच्यासाठी कोणताच दिलासा दिला गेलेला नाही. मनरेगा, संरक्षण याशिवाय जनतेपुढे सध्याच्या स्थितीत उभी ठाकलेली आव्हाने याचा अर्थसंकल्पीय भाषणात साधा उल्लेखही दिसत नाही', अशा शब्दांत थरूर यांनी निशाणा साधला.
वाचा: घरांसाठीची आजवरची मोठी घोषणा, ४८ हजार कोटींचा निधी आणि...
ममता बॅनर्जी यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. बेरोजगारी आणि महागाई अशा दुहेरी संकटाच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य जनतेसाठी हे बजेट झीरो आहे, अशा शब्दांत ममता यांनी हल्ला चढवला. सरकारने मोठमोठ्या वल्गना केल्यात पण प्रत्यक्षात सामान्यांना या बजेटमधून काहीच मिळालेले नाही, असे नमूद करतानाच हा तर कल्पनाविलास, भूलभुलैया आणि शब्दांचा खेळ असल्याचा टोला ममता यांनी हाणला.
वाचा : पीएम गती शक्ती; पायाभूत क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारी महत्वाकांक्षी योजना
माकप नेते सीताराम येचुरी यांनीही बेजटवर टीका केली. देशात बेरोजगारी, गरिबी, भूकबळी वाढत असताना याच संकटकाळात नफेखोरी करणाऱ्या धनिकांवर अधिक कर का लावला गेला नाही, असा सवाल येचुरी यांनी केला. देशातील आर्थिक विषमतेवरही त्यांनी बोट ठेवले. सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांकडे देशाची ७५ टक्के संपत्ती एकवटली आहे तर तळाच्या ६० टक्के लोकांकडे एकूण संपत्तीतला ५ टक्के भागही नाही. ही गंभीर स्थिती असताना तुमचे बजेट नेमके कुणासाठी आहे?, असा सवालही येचुरी यांनी केला. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही बजेटवर नाराजी व्यक्त केली. 'यंदाच्या बजेटमध्ये काहीच नाही, अशी माझी पहिली प्रतिक्रिया असेल. या बजेटने सर्वांची निराशा केली आहे. देशातील जनता महागाईचे चटके सोसत असताना त्यांच्यासाठी कोणताच दिलासा दिला गेलेला नाही. मनरेगा, संरक्षण याशिवाय जनतेपुढे सध्याच्या स्थितीत उभी ठाकलेली आव्हाने याचा अर्थसंकल्पीय भाषणात साधा उल्लेखही दिसत नाही', अशा शब्दांत थरूर यांनी निशाणा साधला.
वाचा: घरांसाठीची आजवरची मोठी घोषणा, ४८ हजार कोटींचा निधी आणि...