अ‍ॅपशहर

पहलू खान हत्या प्रकरणाचा तपास आता SITकडे

देशाला हादरवून टाकणाऱ्या पहलू खान झुंडबळी प्रकरणाचा तपास आता विशेष चौकशी पथक (एसआयटी) करणार आहे. राजस्थान सरकारनं शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीला पंधरा दिवसांत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2019, 1:18 pm
जयपूर: देशाला हादरवून टाकणाऱ्या पहलू खान झुंडबळी प्रकरणाचा तपास आता विशेष चौकशी पथक (एसआयटी) करणार आहे. राजस्थान सरकारनं शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीला पंधरा दिवसांत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pehlu-Khan-lynching-case


अलवर जिल्हा न्यायालयाने बुधवारी पहलू खान हत्या प्रकरणातील सहा आरोपींना दोषमुक्त केलं. पोलिसांचा ढिसाळ कारभार आणि न्यायालयासमोर खटला उभा करण्यासाठी आवश्यक अगदी सामान्य तपास प्रक्रियाही या प्रकरणात पूर्ण न केल्याने सर्व सहा आरोपींची सुटका झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहलू खान हत्या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी शुक्रवारी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. तपास प्रक्रियेतील त्रुटींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज