अ‍ॅपशहर

‘जनताच नोटबंदीचा बदला घेईल’

‘उत्तर प्रदेशातील जनता नोटाबंदीमुळे झालेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भाजपने सामान्य जनतेला हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभे केले. आता निवडणुकीत हीच जनता भाजपच्या विरोधात मतदानाच्या रांगेत उभी राहील.

Maharashtra Times 20 Feb 2017, 5:39 am
झांशी : ‘उत्तर प्रदेशातील जनता नोटाबंदीमुळे झालेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भाजपने सामान्य जनतेला हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभे केले. आता निवडणुकीत हीच जनता भाजपच्या विरोधात मतदानाच्या रांगेत उभी राहील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम people will change notabandi
‘जनताच नोटबंदीचा बदला घेईल’


तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप नेत्यांना रक्तदाब तपासावा लागेल,’ अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले. ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे मोदींचा मूड बदलला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसूच हरवले आहे. राज्यात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सरकार स्थापन करतील, याची जाणीवही त्यांना झाली आहे,’ असे राहुल म्हणाले. ‘भाजप आणि बहुजन समाज पक्षाची हातमिळवणी असल्याने मतदारांनी बसपला मतदान करू नये,’ असे आवाहन अखिलेश यांनी केले.

‘अखिलेशच पुन्हा सीएम’

इटावा : ‘समाजवादी पक्षात कोणतीही फूट नसून, भरपूर विकासकामे केलेली असल्याने अखिलेश पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील,’ असा विश्वास समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव यांनी व्यक्त केला. मुलायमसिंग प्रचारात सक्रिय का नव्हते, असे विचारले असता, ते म्हणाले, ‘मी प्रचार करतो आहे. मतदानाचे काही टप्पे अजून बाकी आहेत. त्यासाठी मी प्रचार करेन.’ बंधू शिवपाल यादव हे इटावातील जसवंतनगरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होत असून, त्यातील तीन टप्पे पार पडले आहेत. उर्वरीत टप्पे २३ आणि २७ फेब्रुवारी; तसेच ४ आणि ८ मार्चला होतील. निकाल ११ मार्चला जाहीर होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज