अ‍ॅपशहर

पेप्सिकोची बिनशर्त माघार; शेतकऱ्यांना दिलासा

बटाट्यावरून शेतकऱ्यांना कोर्टात खेचणाऱ्या अमेरिकन कंपनी पेप्सिकोने अखेर या खटल्यातून बिनशर्त माघार घेतली आहे. परिणामी बनासकांठा, साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 10:43 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lays


बटाट्यावरून शेतकऱ्यांना कोर्टात खेचणाऱ्या अमेरिकन कंपनी पेप्सिकोने अखेर या खटल्यातून बिनशर्त माघार घेतली आहे. परिणामी बनासकांठा, साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पेप्सिकोने बटाट्याच्या एका विशिष्ट जातीच्या पेटंटच्या उल्लंघनाचा आरोप करत गुजरातच्या नऊ शेतकऱ्यांवर खटला दाखल केला होता. पेप्सिकोने लेज चिप्ससाठी ज्या FC5 या प्रकारातील बटाट्यांचं पेटंट घेतलं होतं, त्या प्रकारच्या बटाट्याची बेकायदा शेती करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांवर करण्यात आला होता.

यानंतर देशभरात लोकांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला. सोशल मीडियावर पेप्सिकोच्या या निर्णयावर टीका करण्यात आली. पेप्सिकोने प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर्स राइट्स (PPVFR) या कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होता. निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांनीही शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली आणि हा राजकीय मुद्दा बनला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज