अ‍ॅपशहर

'देशाला केलेल्या संबोधनात PM मोदींनी 'ज्ञान' पाजळलं'

देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला केलेल्या संबोधनात नागरिकांना करोनासंबंधी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2021, 1:44 am
नवी दिल्लीः करोनाने स्थिती बिकट होत चालल्याने पंतप्रधान मोदींनी मंगळवारी देशाला संबोधित केलं. आता पंतप्रधान मोदींच्या संबोधनावरून काँग्रेसने टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनातून ज्ञान पाजळलं आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या जीवाची सुरक्षा स्वतःला करण्यास सांगितलं आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला यांनी मोदींच्या संबोधनानंतर ट्वीट केलं. 'आज रात्री ८.४५ वाजेच्या ज्ञानाचे सार - माझ्याकडून शक्य नाही, प्रवाशांनी आपल्या सामानाची म्हणजेच जीवाची सुरक्षा स्वतःच करावी', असं सुरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम PM Narendra Modi
'देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात PM मोदींनी 'ज्ञान' पाजळलं'


काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही मोदींच्या संबोधनावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाचे सार इतकेच - लोकांनी आपापली जबाबदारी घ्यावी. तुम्ही यातून वाचलात तर एखाद्या उत्सवात किंवा महोत्सवात नक्की भेटू. तोपर्यंत शुभेच्छा. परमेश्वर आपली रक्षा करो, असं तिवारी ट्वीटमध्ये म्हणाले.

pm modi address to nation : करोना नियमांचं पालन करा, देशाला लॉकडाउनपासून वाचवाः PM मोदी

करोनाची दुसरी लाट 'तुफान' बनून आली आहे. पण राज्यांनी करोनाविरोधी लढाईत लॉकडाउनचा पर्याय हा शेवटचाच ठेववा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

coronavirus india update : चांगली बातमी! रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले, कोविड योद्ध्यांचे विमा कवचही कायम

महत्वाचे लेख