अ‍ॅपशहर

हल्लेखोरांना सोडणार नाही!: मोदींचा देशाला शब्द

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. हा हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना धडा शिकवणारच,' असा शब्दच मोदींनी देशाला दिला आहे.

Maharashtra Times 18 Sep 2016, 2:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi condemns terror attack in jks uri
हल्लेखोरांना सोडणार नाही!: मोदींचा देशाला शब्द


जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. हा हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना धडा शिकवणारच,' असा शब्दच मोदींनी देशाला दिला आहे.

उरीतील हल्ल्यानंतर ट्विटरवरून मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'उरीतील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी सलाम करतो. त्यांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे,' असं मोदी यांनी म्हटलं आहे. 'गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. संरक्षणमंत्री स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करतील,' असंही ट्विट मोदी यांनी केलं आहे.

We strongly condemn the cowardly terror attack in Uri. I assure the nation that those behind this despicable attack will not go unpunished. — Narendra Modi (@narendramodi) September 18, 2016 दहशतवादानं प्रश्न सुटणार नाही!: येचुरी

डाव्या पक्षांनीही काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध केला आहे. 'दहशतवादानं काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. सर्व संबंधितांशी चर्चा हाच एक मार्ग आहे. पाकिस्ताननं गंभीरपणं याचा विचार करावा आणि सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणं थांबवावं,' असं ट्विट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज